tag:blogger.com,1999:blog-17975767305294965322024-03-12T21:51:53.859-07:00sureshnaiksureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.comBlogger59125tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-70282250371040097502011-02-27T00:01:00.000-08:002011-02-27T00:03:05.480-08:00आनंदाचा स्त्रोतपुस्तके वाचण्यासंदर्भात साहित्यिक संजय भास्कर जोशी यांनी काल रात्री एका कार्यक्रमात मस्त टिप्स दिल्या.या पद्धतीने कुणी पुस्तक वाचत असतील किंवा नाही.पण त्या टिप्स नक्कीच उपयुक्त आहेत. वाचनाचा आनंद वाढविणाऱ्या आणि त्यातले माधुर्य अधिक काळ टिकविणाऱ्या आहेत.<br /><br /> "पुस्तक मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत वाचावे.पुस्तकाच्या प्रत्येक अंगावर कुणीतरी प्रचंड मेहनत घेतलेली असते.त्याला त्यातून काही तरी सांगायचे असते. मुखपृष्ठावर असलेल्या चित्रात त्या पुस्तकात सांगितलेले साररूपाने किंवा प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेले असते. मलपृष्ठावरील ब्लर्ब ही त्या पुस्तकात डोकावण्याची खिडकी असते.पुस्तकाचा विषय,आशय यांचा अंदाज त्या मजकुरावरून येतो. विशेषतः पुस्तक खरेदी करण्याचा निर्णय करताना हा ब्लर्ब मार्गदर्शक ठरतो. पुस्तकातील अर्पणपत्रिकाही महत्त्वाची असते. भालचंद्र नेमाडे यांनी "कोसला'च्या अर्पणपत्रिकेत "शंभरातील नव्व्याण्णवांना' ती कादंबरी अर्पण केली आहे. अवघेच शब्द, परंतु ते केवढा मोठा आशय सांगून जातात. पुस्तकाची प्रस्तावनाही वाचावी.त्यात काही तारतम्य मात्र पाळायला हवे. वैचारिक पुस्तकाची प्रस्तावना पुस्तक वाचण्याआधी वाचावी, मात्र कथाकादंबऱ्यांची प्रस्तावना आधी वाचू नये . कारण ती आधी वाचली तर पुस्तकासंबंधी काही पूर्वग्रह घेऊन आपण पुढील मजकूर वाचण्याची शक्यता असते.आपण जे वाचतो, त्याविषयी एक टिपण मुद्दाम लिहून ठेवावे.आपल्याला त्या पुस्तकात नेमके काय आढळले, किंवा एखादे पुस्तक वाचल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया झाली हे लिहून ठेवावे. एक पुस्तक जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर आपल्याला वेगवेगळे अर्थ सांगत असते.एक पुस्तक अनेकदा वाचल्यानंतर प्रत्येक वेळी काही तरी नव्या अर्थाचा उलगडा होतो. अनेक साहित्यकृतीमध्ये अशा अनेक मिती,अर्थ दडलेले असतात.आपणच आधीचे टिपण काढून वाचल्यावर आपल्यालाही वेगवेगळ्या क्षणी कसा वेगवेगळा अर्थ प्रतीत झाला याची प्रचिती येते. ती आनंददायक असते.वाचल्यानंतर आपला अभिप्राय लेखकाला जरूर कळवा. लेखकही आपल्या या लेखनासंबंधी वाचकाच्या भावना समजून घ्यायला आतुर असतो. अशा संवादातूनआनंदाची पखरण होत असते.'<br /><br /> संजय जोशी बोलले,त्यातील एखाद्या गोष्टीचा एकदा तरी प्रयोग करून पाहावाच.कुणी तसा केलेलाही असेल. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टीत आनंदाचा प्रचंड खजिना दडला आहे.त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सातत्याने या गोष्टी स्वतः केलेल्या नाहीत.मात्र, या सर्व गोष्टी कधी ना कधी केलेल्या आहेत. कुणाचे पुस्तक वा लेख, कविता आवडली तर त्याला तसे सांगितले आहे.त्याचा त्यांना होणार आनंद पाहिलेला आहे.माझ्या लिखाणाविषयी कुणी कधी अभिप्राय देते,तेव्हाचा आनंद मीही अनुभवला आहे.काही पुस्तकेंविषयी टिपणे काढून ठेवली आहेत.ती वाचताना कधी ते पुस्तक पुन्हा अंतःचक्षूपुढून तरळून गेले आहे.कधी ते पुन्हा वाचावेसे वाटून त्यात पुनःप्रत्ययाचा आनंद उपभोगला आहे.संजय जोशी म्हणाले ते खरेच आहे, आनंद आपल्यापाशी असतो. आपण तो इतरत्र धुंडाळत असतो आणि तो गवसत नाही म्हणून दुःखीकष्टी होत असतो. पुस्तकासारख्या रोज हाताशी येणाऱ्या वस्तूतही अनेक अंगांनी उपभोगता येणाऱ्या आनंदाचा प्रचंड स्त्रोत दडलेला आहे.कुणीही त्याला भिडून त्याची अनुभूती घ्यायला हरकत नाही.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-82564425111190861532011-02-14T08:46:00.000-08:002011-02-14T08:50:05.465-08:00गुलाब नही, कॉंटेही सही !हॅपी व्हॅलेंटाइन डे !<br /> <br /><span class=""></span>शुभेच्छा देण्याचा आणि थोडाफार सणासारखा साजरा करण्याचा आजचा आणखी एक दिवस.<br /><br /> या दिवसाची धूम अनेक दिवस आधीपासून सुरू झालेली असते.यंदा कुणा अपरिचिताने मला एक मेल पाठविला.त्यात व्हॅलेंटाइन डेच्या आधीची "सप्तपदी' सांगितलेली आहे. व्हॅलेंटाइन डेचे वेध सात फेब्रुवारीला सुरू होतात.रोझ डे, प्रपोझ डे,चॉकलेट डे,टेडी डे,प्रॉमिस डे, किस डे, हग डे अशा सात दिवसांच्या प्रवासानंतर आठव्या दिवशी उगवतो तो व्हॅलेंटाइन डे. आम्ही अशा वाटेने कधी गेलेलो नसल्याने या साऱ्या उपचारांची माहिती कधी झाली नाही. खूप आधी कधी तरी कुणी एकदा सांगितले होते, बड्या हॉटेलात म्हणे मुख्य जेवण यायच्या आधी चिटूकमिटूक खाण्यापिण्याच्या काही पायऱ्या असतात.त्याला कसलासा "कोर्स' म्हणतात. ब्रिटिश एटिकेटस्मध्ये त्याचे फार महत्त्व असते.त्या पायऱ्यांवरही कधी जाणे झालेले नसल्याने या अशा सगळ्या वातावरणापासून आम्ही तसे अलिप्त आणि म्हणून अनभिज्ञही राहिलो. या मेलने व्हॅलेंटाइन डेचे नवे "दर्शन' घडविल्याने पहिल्यांदा त्याची माहिती झाली. (त्याच्या वापराच्या काही टिप्स सोबत दिल्या असत्या, तर ..... )<br /><br /> काही वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेसारख्या परदेशी "फॅड'ना फार विरोध झाला होता.आताही तो तसा संपलेला नाही.कदाचित त्याची धार व तीव्रता कमी झालेली असावी.व्हॅलेंटाइन डेवरून गदारोळ चालू असताना आणि आताही या दिवसाच्या निमित्ताने मला हटकून आठवते ते आपल्या पुराणकाळातील गांधर्व विवाह, पाणिग्रहण वगैरेसंबंधीच्या कथा.संकटात सापडलेल्या स्त्रीला वाचविण्यासाठी तिचा हात धरला तरी तो पाणिग्रहणाचा प्रकार झाल्याच्या किंवा तेवढ्याने झालेल्या परपुरुषाच्या स्पर्शाने तो पुरुष स्त्रीने मनाने वरल्याच्या अथवा वरावा लागल्याच्या कथा पुराणात सापडतात.कारण त्या स्पर्शाने तो परपुरुष स्वपुरुष ठरे आणि त्याशिवाय अन्य पुरुषाचा स्पर्श सोडाच, विचारही परपुरुषाचा विचार ठरे, अशी काही नीतिमत्ता,संस्कृती-परंपरा त्याकाळी समाजात रूढ होती.त्यामुळे व्हॅलेंटाइन हा विदेशी प्रकार आहे, असे कुणी म्हटले,तरी त्याचे मूळ भारतात असावे असे मला सारखे वाटते. केवळ मूळच नव्हे, आपल्याकडे व्हॅलेंटाइनचा प्रकार फारच प्रगत होता, असे म्हणावे लागते. गांधर्व विवाहाच्या, पाणिग्रहणाच्या कथा हे त्याचे पुरावे आहेत.त्यात पुन्हा असे एक दिवस रोझसाठी, एक दिवस टेडीसाठी, एक दिवस चुंबनासाठी, एक दिवस आलिंगनासाठी असा काही राखीव कार्यक्रम आखून ताटकळत राहायचे झंझट नाही. धरला हात, की प्रकार साजराच ! नाही तरी आपली संस्कृती प्राचीन काळीही फारच प्रगत होती.विज्ञान,खगोलशास्त्रासारख्या अनेक क्षेत्रात पुढारलेली होती.ती एवढ्या बाबतीत मागे कशी पडली असती !<br /><br /> अनेकांना मात्र हे व्हॅलेंटाइनचे प्रकरण जमत नाही.आम्हीही त्यातलेच.ते जमणारही नाही.मेड फॉर इचअदरच्या धर्तीवर सांगायचे तर वी आर नॉट मेड फॉर दॅट ! त्याचा मोठा पुरावा म्हणजे आजचा प्रसंग.<br /><br /> सकाळी ऑफिसच्या पार्किंगमध्ये गाडी लावून खाली उतरलो.इमारतीच्या भिंतीला लागून काही फुलझाडे, फुलझाडांच्या कुंड्या आहेत. दरवाजा बंद करून मागे वळताना खांद्यावर शर्टात एका फुलझाडाची फांदी अडकली.माझ्या वळण्याच्या वेगामुळे तिचे काटे शर्टात रुतून तो थोडासा फाटला.फांदी अलगद सोडवून घेतली. पाहिले तर गुलाबाची फांदी होती. या ठिकाणी अनेकदा गाडी पार्क करतो.कधीही ही फांदी अंगचटीला आली नव्हती.नेमकी आजच ती भिडली. गंमत म्हणजे त्या फांदीवर एकही गुलाब नव्हता.कुणी खुडून नेला नव्हता, तर मुळातच उमललेला नव्हता.काहीशी वठलेली ती फांदी होती.<br /> <br />लोक व्हॅलेंटाइन डेला गुलाब देतात.मला भेटले गुलाबाचे काटे,तेही दस्तुरखुद्द झाडाकडून !sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-590700735726106062011-01-01T06:30:00.000-08:002011-01-01T06:33:37.403-08:00स्वागत नववर्षाचे !<span class=""></span><br />आज आणखी एका नव्या वर्षाला सुरवात झाली.<br /><br />आपल्या देशात अनेक वेळा नव्या वर्षाला आरंभ होत असतो. ते सगळे साजरे करण्याचे क्षण असतात.तसा हाही एक साजरा करण्याचा क्षण आहे.गंमत म्हणजे प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरवातीला वर्षभरासाठी संकल्प केले जातात.त्याचे काय होते हे विचारायचे नसतेच.कारण ते वर्ष संपायच्या आतच दुसरे नवे वर्ष सुरू होत असते. आता एक जानेवारीला सुरू झालेले वर्ष 31 डिसेंबरपर्यंत आहे.परंतु 31 डिसेंबर यायच्या आतच चैत्राच्या प्रारंभी गुढी पाडव्याला नवे वर्ष सुरू होणार आहे. त्याला अवघे तीनच महिने राहिलेले आहेत.अशी एका कॅलेंडर वर्षांत अनेकांची नववर्षे सुरू होतच असतात.त्याशिवाय व्यावहारिक नवी वर्षेही असतात.उदाहरणार्थ, येत्या एक एप्रिलला नवे वित्तीय वर्ष सुरू होत असते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असते.त्या त्या वर्षांचे संकल्प सोडण्याची प्रथा नाही. किंवा असली तरी त्याची फार चर्चा होत नाही.परंतु, ही नवी वर्षे खरी तोंडाला फेस आणणारी असतात.कारण या नव्या वर्षांच्या प्रारंभी केवळ संकल्प करून भागत नाही, त्या वर्षभरातील आर्थिक व्यवहारांचे पक्के नियोजनच करावे लागते.अन्यथा वेगवेगळ्या खर्चाची भागवणूक करताना प्रचंड धावपळ,प्रसंगी उसनवारी करणे भाग पडते.ते सारे निभावून नेताना आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांचे बजेट आणि हिशेबठिशेब कोलमडून पडतात.त्याने कंबरडे मोडते आणि स्वास्थ्यही हरवते.तसे पाहिले तर एक जानेवारीला वर्ष सुरू होताच राहिलेल्या नव्वद दिवसात सध्याचे आर्थिक वर्ष संपणार असल्याची चाहूल लागते.ज्यांना कर वगैरे भरावे लागतात आणि आधीपासून काही तजवीज केलेली नसते, त्यांना तर ही चाहूल धडकीच भरवणारी असते.अनेकदा अशी आवश्यक तजवीज केलेली नसतेच.मग, राहिलेल्या थोडक्या अवधीत आवश्यक त्या साऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी,गुंतवणुकीसाठी, सगळे नीट मार्गी लावण्यासाठी जी धावपळ करावी लागते, ती अनेकदा झोप उडवणारी नाही तर प्रचंड ताण देणारी असते.इथून जे बजेट बिघडते, ते काही केल्या पुढच्या काळात सुरळीत होत नाही.देशाचे असतील किंवा आपण जिथे राहते त्या राज्याचे असतील, अर्थसंकल्प आणि अर्थमंत्रीही आपल्या विवंचना सोडवू शकत नाही.उलटपक्षी ते त्यात अनेकदा भरच घालतात.त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचा जल्लोष मनात घोळवताना संकल्प करायचा तर काय करायचा याचा विचार करताना मनात आले,की आपण आपले आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन किमानपक्षी नीट केले पाहिजे.स्वतःसाठी म्हणून काही वेळ,उसंत काढण्यासाठी दिवसाच्या चोवीस तासांचे काही गणित मांडले पाहिजे आणि ते अमलातही आणले पाहिजे. एवढे करू शकलो,तर वर्षारंभाच्या पहिल्या दिवसाचा आनंद देऊ शकणारे अनेक दिवस वर्षभरात<br />आपल्याला भेटत राहतील !<br />तसे ते सगळ्यांना भेटावेत अशा सर्वांनाच शुभेच्छा!sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-57661531522437601682010-12-31T02:49:00.000-08:002010-12-31T02:54:34.147-08:00वाद कशासाठी ?<p> </p><p>ठाणे येथे 84 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठल्याही वादाशिवाय पार पडेल असे वातावरण अगदी संमेलनाच्या प्रारंभापर्यंत होते.पुण्यात दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याचा वाद उफाळून आला.त्याची झळ संमेलनाच्या मंडपापर्यंत पोचली. प्रत्यक्ष संमेलन सुरू झाल्यानंतर संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेच्या आलेल्या उल्लेखावरून स्मरणिकेतील ते पान फाडून त्याला आग लावण्यात आली.हे वाद किती प्रस्तुत वा अप्रस्तुत होते, हा वेगळा मुद्दा. मात्र,वादाच्या संमेलनाशी जडलेल्या नात्याची फारकत होणार नाही हे ठाण्याच्या संमेलनातही ठळकपणे जाणवले.</p><p>संमेलनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखात यंदाच्या वर्षात ज्यांच्या जन्मशताब्दी येतात, त्यांच्याविषयी माहिती देणारा लेख समाविष्ट करण्यात आला होता. त्यात नथुराम गोडसेविषयी तीन ओळींची माहिती होती. त्यांचा हा उल्लेखच वादाला कारणीभूत ठरला. संमेलन आयोजकांनी त्यावर माफी मागितली. वाद फार चिघळला नाही.संमेलनाला वादाचे गालबोट लागण्यास तेवढा प्रसंगही पुरेसा ठरला.</p><p> हे सर्व घडून गेल्यानंतर संमेलनाच्या शेवटच्या दिवशी त्या अनुषंगाने चर्चा चालली होती. एक जण म्हणाला, "खरेच इतके आकांडतांडव करण्याची गरज होती का? स्मरणिकेत तो उल्लेख चुकीचा होता तर ती चूक आयोजकांच्या निदर्शनास आणून सुधारून घेता आली नसती का?'</p><p>या प्रश्नामागील भावना चांगली होती. परंतु, त्या प्रश्नाचे तेवढे सरळ उत्तर देणे मात्र कठीण होते. मी त्याला म्हटले,"तसे करताही आले असते. परंतु तेवढे सामंजस्य असते,तर मुळातच वाद आणि नंतरचा अप्रिय प्रसंग घडला नसता. हे तसेच का घडले याची ज्याची त्याची काही कारणेही असतील. पण, गुपचूपपणे चूक दुरुस्त केली असती तर ती माणसेही कुणाच्या लक्षात आली नसती. काही वेळा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी निमित्त लागते. कारण प्रत्येकाला आपल्यासाठी काही "स्पेस" हवी असते. या सर्वांमागे तसाही विचार असू शकतो.' </p><p>हा वाद तत्त्वासाठी होता की "स्पेस'साठी हा विचार तेव्हापासून डोक्यात आहे. कारण नथुरामविषयी नंतर एक विशेषांकही संमेलनस्थळी वितरित करण्यात आला होता.त्याबद्दल कुणाचीच काही प्रतिक्रिया आली नाही.</p>sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-60546985817872587562010-12-13T01:03:00.000-08:002010-12-13T01:06:12.908-08:00कृष्णार्पणमस्तुगेले काही दिवस, दिवस म्हणण्यापेक्षा महिनेच म्हणावे लागेल, मी माझ्या ब्लॉगवर आलेलो नाही.मध्ये काही वेळा आठवण झाली,काही लिहायचे मनात होते, परंतु कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आणि काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे ते राहून गेले. वितीली चुकले की वावाला चुकते असे म्हणतात, तशी काहीशी ही अवस्था झाली. मग तासभर बसून एकदाचा माझाच ब्लॉग मी गाठला.मध्ये किती खंड पडला,त्याचा हिशेब करू लागलो.तेवढ्यात तिथे एक नोंद होती, तिकडे लक्ष गेले. मी अठरा आठवडे दोन दिवस ब्लॉगवर आलेलो नाही,अशी ती नोंद होती. (त्यालाही आता आठवडा उलटला आहे.)मध्ये गेलेल्या अवधीचा तयार हिशेबच मिळाला.तो करायचा त्रास वाचला, तेव्हा दोन गोष्टी मनात आल्या, त्या लिहून ब्लॉगवर नियमित येण्याचे मी ठरवतो आहे.<br /><br />पहिली गोष्ट मनात आली, ती एक किस्सा किंवा विनोद आहे....<br /><br />एकदा मोठी चोरी करून काही चोर लांबच्या जंगलात जाऊन विसावले.त्यातील दोघे तरुण चोर वाटणी करण्यासाठी चोरीच्या मालाची मोजदाद करून लागले. त्यावेळी तिसरा म्हणाला," आता शांत झोपा.एवढे कष्ट आणि धावपळ करून आपण दमलो आहोत.या मालाची किंमत उद्या वर्तमानपत्रात येईलच छापून, ती मोजण्यासाठी कशाला कष्ट करता?'<br /><br />आणि दुसरी गोष्ट, तशी जुनी, पण कधीमधी आम्हा काही मित्रमंडळीत चर्चेला आलेली...<br /><br />कुणी चार मित्र, परिचित एकत्र आले, की प्रसंग कसलाही असो,त्यांच्या चर्चेत राजकारण, सेक्स आणि अध्यात्म हे विषय हटकून येतातच. एकदा चर्चा चालली होती, कुणी माणूस किती भ्रष्टाचारी आहे, किती लांड्यालबाड्या त्याने केल्या आणि आता तो कसा अडचणीत आलेला आहे, वगैरे... <br /><br />एक जण म्हणाला, "सगळं इथंच करायचं आणि इथंच भरायचं...'<br /><br />दुसरा एक जण माणसे कशी बेईमान असतात, याविषयी बोलत होता.त्याने कुणाला कशी मदत केली, ती तो कसा विसरला, भल्याची दुनिया नाही, वगैरे....<br /><br />तिसरा म्हणाला, "चांगले केलं की कुठं ना कुठे त्याबदली चांगलंच भेटतं...'त्याने कुणाला कशी मदत केली होती आणि त्यांच्या गरजेच्या वेळी त्याला अनपेक्षितपणे कशी मदत मिळाली, वगैरे..<br /><br />असे अनुभव सगळे जणच सांगू लागले.मला आठवते,त्यावेळी मी म्हणालो होतो, की "भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, "कृष्णार्पणमस्तु.' जे करायचे ते कृष्णाच्या नावाने म्हणजे भगवंताच्या नावाने सोडून द्यायचे आणि आपण विसरून जायचे.आपल्या पापपुण्याचा हिशेब लिहीत बसायचे आपल्याला काही कारण नाही.त्यासाठी वर चित्रगुप्ताची व्यवस्था आहे.तो सगळ्या नोंदी ठेवीत असेल, तर त्यासाठी आपण काही डोके शिणवायचे नाही.मी तरी शिणवीत नाही.सगळं संपल्यावर त्याला म्हणायचं फारतर, काय बाबा माझा हिशेब झाला ते सांग.त्यासाठी आता कशाला मेंदूच्या मागे अधिकचं काम लावायचे?'sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-5322592157290262112010-03-16T08:15:00.000-07:002010-03-16T08:19:18.812-07:00पुन्हा कुळागरी सैरनेत्रावळीच्या कुळागरातील "दिलखुलास' कार्यक्रमानंतर बरोबर दोन आठवड्यांनी, रविवारी (14 मार्च) गुडे -केपे येथे पुन्हा कुळागरात एका साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या संस्थेने मराठी - कोकणी लेखकांचा एक मेळावा नागेश लव फॉरेस्ट गार्डनमध्ये आयोजित केला होता. संस्थेचा हा यंदाचा या संकल्पनेतील तिसरा कार्यक्रम. सावई-वेरे येथील स्पाईस फार्मवर पहिला आणि गेल्या वर्षी सिद्धनाथ पर्वतावर दुसरा कार्यक्रम झाला होता.साहित्यातील निसर्गचित्रण आणि साहित्यातील पर्यावरण अशी विषयसूत्रे अनुक्रमे दोन्ही वेळेला होती.यावेळी विषयाचे सूत्र नव्हते. प्रत्येकाने आपल्या मनाला वाटेल त्या विषयावर मत, विचार मांडावे, असे समन्वयक दामोदर मावजो यांनी सुरवातीलाच सांगितले. त्यांनी स्वतः वैश्विकीकरणाची मूळ संकल्पना आपल्या "वसुधैव कुटुंबकम्' कडून आता ग्लोबल व्हिलेजपर्यत आल्याचे एक सूत्र चर्चेसाठी खुले केले.भाषा आणि संस्कृतीच्या ऱ्हासाविषयीची चिंता व्यक्त करताना 33 टक्के आरक्षणाबाबत संसदेत घडलेल्या ताज्या नाटकांच्या अनुषंगाने महिला सक्षमीकरणाच्या विषयाचे सूत्रही लेखकांसाठी मोकळे केले.<br /><br />विषयाचे बंधन नसल्याने ज्याला हवे त्या त्या विषयावर बोलण्याची मोकळीक मिळाली.मावजो यांच्या प्रास्ताविकातील धागे धरत-सोडत संपूर्ण कार्यक्रमात विविध मते व्यक्त झाली. विषयाचे बंधन नसल्याने किंबहुना विषयाचे एक सूत्र धरून बोलण्याचे बंधन नसल्याने बोलण्याचा, व्यक्त होण्याचा मोकळेपणा सर्वांना मिळाला,तो सर्वांनी उपभोगला,अनुभवला.मध्यवर्ती विषय नसल्याने चर्चा रंगली, तरी तिला काही ठोस आकार मिळाला नाही. "येणाऱ्या काळात दोनच गोष्टी राहतील- एक, इंग्रजी भाषा आणि दुसरा आंतरजातीय विवाह ' इथून सुरवात झालेली चर्चा भटक्या कुत्र्यांबद्दल भूतदया दाखवण्याचे आवाहन करता करता रेबीज रोग किती घातक आहे, त्यासंदर्भात काय खबरदारी घ्यायला, हवी इथपर्यंत येऊन थांबली.गोमंतकीयांची मातृभाषा कुठली या प्रश्नाला स्पर्श केला गेला.त्याबद्दलच्या वादात न शिरता वक्त्याने मध्यममार्ग म्हणून "भारतीय भाषा'च्या जतन-संवर्धनाची भूमिका मांडली.इंग्रजी स्वीकारताना आपल्या भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणाची गरज अधोरेखित करण्यात आली. गोमंतकीयांचे साहित्य किती दर्जेदार, हाही प्रश्न उपस्थित केला गेला.वेळेअभावी त्यावर ऊहापोह झाला नाही.साहित्याचा समाजावर परिणाम होतो का, या प्रश्नावर होय- नाही अशी मते व्यक्त झाली.मराठी -कोकणी लेखक एकत्र येतात, कार्यक्रम संपला की आपापल्या वाटेने निघून जातात. असे न होता त्यांनी हातात हात घालून एकत्र वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.त्यावर पुढे कुणी काही बोलले नाही. आपल्याला हवे ते आणि तितके वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत नाही,शब्दांच्या-जागेच्या मर्यादा आड येतात, याविषयीची खंतही व्यक्त झाली.पुस्तकाची मुद्रणप्रत तयार करूनही प्रकाशित करण्याचा योग जुळून येत नाही, प्रकाशनासाठी अर्थसाह्याच्या अनेक योजना कार्यरत असूनही पुस्तक प्रकाशित व्हायला दोन दोन वर्षे लागतात,अशीही खंत व्यक्त झाली. संस्कृती, भाषा यांच्या ऱ्हासाविषयी चिंता व्यक्त करताना पर्यावरणाचा होणारा नाश, बोडके होणारे डोंगर, आटत जाणारे पाण्याचे झरे, प्रशासन-राजकारणातील भ्रष्टाचार याविषयी तप्त-संतप्त उद्गारही निघाले.अनेकांनी आपल्या कविता सादर करून दाद मिळविली.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी झालेल्या प्रत्येकाने अभिव्यक्तीला वाट मोकळी करून दिली. खुलेपणाने आणि दिलखुलास झालेल्या या कार्यक्रमाला लाभलेली निसर्गाची पार्श्वभूमी पुन्हा एकदा कधी तरी या ठिकाणाला भेट देण्याचा मोह मनात जागवून गेली.<br /><br />राजन लोटलीकरांचे हे कुळागर तसे नव्याने विकसित होत असलेले दिसले. माडा पोफळीची एरव्ही कुळागरी गच्च गर्दी नव्हती, पण हिरवागर्दपणा भरपूर होता. भोजनासाठी दालन, कार्यक्रमासाठी दालन (बांबूपासून दरवाजे, खिडक्या बनविलेल्या या दालनाला भिंती नव्हत्या !), स्वच्छतागृहांचे तीनेक ठिकाणचे वेगळे ब्लॉक्स, शॉवर लावून केलेले रेन डान्सचे फ्लोअर, शॉवरबाथ, नैसर्गिक झरीला छान, कल्पकतेने दिलेले स्वीमिंग पूलचे स्वरूप,त्यात दिसलेले, आता अनेक गावातही दुर्मिळ झालेले करणकाटके हे छोटे मासे, तिथे फिश बाईटची केलेली योजना आणि सारी सैर संपल्यावर वनौषधी, झाडपाला घालून तापवलेल्या गरम पाण्यात पावले शेकून घेण्याची खास ट्रीट हा सारा सरंजाम कॅन्व्हासवरच्या चित्रासारखा मनावर रेखांकित होऊन राहिला. रॉक क्लाइंबिंगचा खेळ इथे उपलब्ध आहे. परंतु मुक्त संवादी कार्यक्रम आणि माडापोफळीच्या हिरव्यागंधित निसर्गकुशीतील वातावरणामुळे मन आकाशस्पर्शाला कधीच झेपावले होते.रॉक क्लायबिंगचा विचारही त्यात जमिनीवरच राहिला!sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-50677993713312291992010-03-04T05:34:00.000-08:002010-03-04T05:36:35.182-08:00"दिलखुलास' सोहळासाहित्यनिर्मिती आणि प्रकाशन सोहळे, दोन्ही ऐन भरात आहेत.आठ पंधरा दिवसांनी गोव्यात पणजीत, नाही तर अन्य एखाद्या गावात,शहरात पुस्तक प्रकाशनाचा समारंभ ठरलेला.लेखकाचा, रसिकांचा आणि आयोजकांचाही याबाबतीतला उत्साह उतू जाणारा. इतक्या सातत्याने आणि सुविहितपणाने हे सोहळे होत आहेत, की एखाद्या कार्यक्रमानंतर लगेचच दुसऱ्या तशाच कार्यक्रमाची वर्दी नाही मिळाली,की चुकल्या चुकल्यासारखे वाटते. एवढी या कार्यक्रमांची आताशा सर्वांनाच सवय लागली आहे.त्याचे स्वागतही तेवढ्याच अप्रूपानिशी चाललेले असते. कार्यक्रमाच्या औपचारिकतेबरोबर नियमाने हजेरी लावणाऱ्यांमध्ये एक जवळिकीचे,आपुलकीचे नाते जुळून आले आहे.ते प्रत्येकवेळी नव्या ताजेपणाने दृढावत चाललेले आहे. गेल्या रविवारी असाच एक प्रकाशन सोहळा मडगावचे आमचे कविमित्र अशोक बोरकर यांनी चक्क नेत्रावळी येथील तानशीकरांच्या कुळागरात आयोजित केला. त्यांच्या "दिलखुलास' या कवितासंग्रहाचे प्रकाशन होते. कवितासंग्रहाच्या नावाप्रमाणेच कवी अशोक हे दिलखुलास व्यक्तिमत्वाचे. पणजीत होणाऱ्या "काव्यसंध्या' या मासिक कवितावाचनाच्या कार्यक्रमाला मडगावहून सपत्निक येऊन नियमित हजेरी लावणारे.त्यांच्या पत्नी कविता याही स्वतः उत्तम कवयित्री.(त्यांची एक कविता "गांधी तुम्ही आऊटडेटेड झालात' मी या ब्लॉगमध्ये दिली होती) कवितेवर इतक्या उत्कटतेने प्रेम करणारी माणसे फार क्वचित पाहायला मिळतात. त्यांच्या काव्यप्रेमाविषयी मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे.नेत्रावळीतील कुळागारात झालेल्या त्यांच्या पुस्तक प्रकाशनसोहळ्याचे एक वैशिष्ट्य मनात नोंदवले गेले, ते हे की बंदिस्त खोलीतून निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या वातावरणात होणारा असा हा पहिलाच समारंभ.छानशा मुक्त छंदातल्या कवितेसारखा हा कार्यक्रम होता. औपचारिकतेला बराचसा फाटा दिल्याने तो रंगलाही चांगला.कार्यक्रमानंतर तानशीकरांच्या मेनुतली फणसाची भाजी कित्येक वर्षांमागे बालपणात घेऊन गेली.तिची चव जिभेवर आणि बालपणी बाहेर धो धो पडणाऱ्या पावसामुळे अंगाभोवती रेंगाळणाऱ्या गारठ्याचा मधूनच कुडकुडवणारा स्पर्श अनुभवत ऊनशी भाजी खाण्यातल्या लज्जतीची आठवण मनात रेंगाळत आहे.<br /><br />"दिलखुलास'च्या प्रकाशनाआधी बुडबडी तळीच्या पटांगणात त्यांच्या "आई ग' या आईविषयी असलेल्या कवितेच्या आणि तिच्याविषयीच्या काही लेखांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ झाला.तो प्रसंग फारच हृद्य होता. अशोक बोरकर यांच्या आईला बुडबुडी तळी पाहायला यायचे होते. आजारपणामुळे त्यांना कधी ते शक्य झाले नाही.आता त्या हयात नसल्याने तो विषय राहिलेला नाही. त्यांची तळी पाहायला येण्याची अधुरी राहिलेली इच्छा त्यांच्यावरच्या पुस्तकाचे प्रकाशन करून त्या स्वरूपात पूर्ण केल्याच्या समाधानाचे काही कण कवीने पदरात बांधून घेतले आहेत.एखाद्या उत्कट मनाच्या कवीला, तरल संवेदनशील मनालाच अशी कल्पना सुचू शकते.त्याचे काही अमिट ठसेही माझ्या मनावर <br />उमटून आहेत.हा सोहळा अनुभवताना आठवणींची एक कविता माझ्या मनात सारखी कूस बदलत राहिली...sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-10651653898236740082010-02-27T01:42:00.000-08:002010-02-27T01:43:14.189-08:00कौशल्यजगणे आले तेव्हापासून जगण्याची लढाईही सुरू झाली. माणूस जितक्या अवस्थांतून उत्क्रांत होत गेला, त्या प्रत्येक अवस्थेच्या टप्प्यात जगण्याच्या लढाईचे स्वरूपही तसतसे बदलत गेले. आदीम अवस्थेतून आता माणसांचे सुसंस्कृत जग अवतरले आहे. लढण्याची आयुधे, साधने, माध्यमे या साऱ्यांतच परिवर्तन घडलेले आहे. सुधारलेल्या, पुढारलेल्या जगातही जगण्याचे संदर्भ सुसंस्कृत-असंस्कृत अंगाने सारखे कूस बदलत आहेत. चढाओढ, स्पर्धा नित्य नवे रूप धारण करीत आहे. त्यातून पुढे निघून जाण्यासाठीच नव्हे, आहे तेवढे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीही आपली साधने, माध्यमे तपासून घेणे आणि ती अद्ययावत ठेवणे अपरिहार्य आहे. ती हाताळण्याचे तंत्र आणि कौशल्य आत्मसात करण्यापासून व्यतीत होणाऱ्या हरेक घटकेगणिक त्यांची धार, प्रखरता, गुणवत्ता वृद्धिंगत करीत राहणेही अपरिहार्य झाले आहे. अनेकदा असलेली कौशल्ये जुनी ठरतात, अपुरी पडतात. तेव्हा त्याच्या मिती वाढवाव्या लागतात किंवा नवी कौशल्ये संपादित करावी लागतात. ते नाही केले तर आपले अस्तित्वही बेदखल होऊन जाण्याचा किंवा नाकारले जाण्याचा धोका आहे. प्रवाहात टिकण्यासाठी, अग्रणी राहण्यासाठी किती कौशल्य असावे याचा काही ठोकताळा बांधावा लागतो. सरसकट अनुभवातून काही अंदाज ठेवून काही दक्ष माणसे त्या दृष्टीने तयारी करीत असतात. तरी अनेकदा फसगत होते. ती टाळण्यासाठी ज्या अनुभवांच्या आधारे आपण काही निष्कर्ष मांडतो, त्या अनुभवांचा दर्जा पडताळून पाहण्याबरोबरच, अनुभवाच्या पुढेही बुद्धीची नजरफेक करायला हवी.<br /><br />एका जंगलात एका ठिकाणी एक हरीण लांब उडीचा सराव करीत होते. दहा फुटापर्यंत त्याची लांब उडी जात होती. त्याला अकरा फुटांचे लक्ष्य गाठायचे होते. काल वाघाच्या हल्ल्यात त्याच्या एका साथीदाराला जीव गमवावा लागला होता. वाघाने उडी मारून त्याचा मागचा पाय पकडून त्याला भक्ष्य केले होते. वाघाच्या उडीचे अंतर दहा फुटांचे होते. आणखी एक फूट लांबची उडी त्या हरणाला जमली असती, तर ते बचावले असते. या हरणाला जिवावरची ही जोखीम टाळायची होती. त्यासाठी जीव तोडून त्याचा सराव चालला होता.<br /><br />त्याच जंगलात दुसऱ्या एका ठिकाणी एक वाघही लांब उडीचा सराव करीत होता. त्याचेही लक्ष्य अकरा फुटापर्यंत लांब उडी मारायचे होते. काल त्याने केलेल्या हल्ल्यात त्याला एक हरीण सापडले. त्याची उडी हरणाच्या मागच्या पायावर पडली. कसेबसे त्याला पंजात अडकवता आले. त्या हरणाची उडी अजून एका फुटाने लांब गेली असती तर काल वाघाला उपवास घडला असता. आपले भक्ष्य गाठण्यासाठी त्याला आपल्या उडीचा पल्ला एका फुटाने वाढवायचा होता. त्यासाठी त्याचाही कसोशीने सराव चालला होता.<br /><br />जगण्याची लढाई, स्पर्धा प्रत्येक वेळी एका फुटाने कठीण होत असते. एक फुटाचा पल्ला वाढवून ती जिंकता येत नाही. त्यासाठी लक्ष्य दोन फुटांचे असायला हवे. <br /><br />(प्रसिद्धी ःदै. गोमन्तक, 7 फेब्रुवारी 2010)sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-75798809164184730082010-02-27T01:38:00.000-08:002010-02-27T01:40:35.170-08:00संकटसंकट कधी एकटे येत नसते, असे म्हणतात. एखादे संकट कोसळले, की संकटांची मालिकाच सुरू होते किंवा एकाच वेळी अनेक संकटे एकदमच एखाद्याला गाठतात. एखाद्याला एकच समस्या वारंवार छळत असते. तो कावून जातो. पण, समस्या काही सुटत नाही. चालताना पायाला ठेच लागून अंगठा दुखावला, की काही ना काही निमित्त होऊन तोच अंगठा ठेचकाळत राहतो; तसे काहीसे संकटांचे, समस्यांचेही होत असते. कमीजास्त फरकाने अनेकांचा हा अनुभव आहे. त्यातूनच वरील म्हणीचे बोल रूढ झाले असावेत. संकट एकटे येत नाही हे दुसऱ्याही एका अर्थाने खरे आहे. संकट येते किंवा समस्या निर्माण होते, तेव्हा सगळा अवकाश संकटाने किंवा समस्येनेच व्यापलेला नसतो. संकट आणि समस्या आपल्यासोबत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि उपायही घेऊन येत असते. आपल्या लक्षात ते येत नाही आणि अनेकदा आपण संकटाचे, समस्येचे बळी ठरतो. चक्रव्यूहात शिरलेला अभिमन्यू तो छेदून बाहेर पडू शकला नाही. बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता म्हणून नव्हे, त्याला तो माहीत नव्हता म्हणून. संकटे, समस्या आपल्याला पोटात ओढून घेतात, तेव्हा त्यांचा चक्रव्यूह चहूबाजूंनी असा पसरून राहतो, की दृष्टी, बुद्धी कुंठित होऊन जाते. आपला अभिमन्यू होऊन जातो. कधी कधी कुणी तरी आपसूकच आपल्याला यातून वाचवेल या आशेवर सारा भरिमार टाकून आपण निष्क्रिय बनून राहतो. आपोआपच संकटमुक्ती व्हावी, अशा इच्छेपोटी अकर्मण्य होऊन जातो. या मानसिकतेमुळे अनेकदा समोर आलेले संकटमुक्तीचे मार्ग आणि माध्यमे आपल्या लक्षात येत नाहीत. संकटातून सुटलो नाही, नुकसान सोसावे लागले, की देव-दैवाला बोल लावायला आपण मोकळे होतो. कधी तीही संधी मिळत नाही. संकटाला दुसरी बाजूही असते. तिथे त्यातून निसटण्याचा मार्गही असतो. संकट येते, तेव्हा त्याच्यासोबत असलेला सुटकेचा मार्ग हेरता आला पाहिजे. त्यासाठी बुद्धी सावध, मनाचे डोळे चौकस असायला हवेत. कुठल्याही स्वरूपाच्या लिप्ताळ्यापासून मन, बुद्धी मुक्त असायला हवी. तिथे चुकले, की संकटाने आपला ग्रास घेतलाच म्हणून समजावे.<br /><br />एका मित्राने सांगितलेली ही गोष्ट ः नदीला पूर आला. गाव बुडू लागले. लोक धावत पळत, मिळेल ते वाहन घेऊन सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले. एक देवभक्त झोपडीत होता. त्याला गाडी घेऊन आलेल्या त्याच्या मित्रांनी सोबत चलायचा आग्रह केला. तो नाही म्हणाला. "आपला देव आहे, तो सुखरूप वाचवेल,'असे सांगून त्याने मित्रांना मार्गस्थ केले. पाणी चढले. झोपडे बुडाले. देवभक्त शेजारच्या टेकडीवर चढला. होड्यांतून गावातली माणसे आली. चल म्हणाली. तो हलला नाही. टेकडीही बुडाली. तो झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. मदतकार्य करणारे सैनिक हेलिकॉप्टरने आले. त्याला आत घेऊ लागले. त्याने नकार दिला. आपला देव वाचवेल म्हणाला. ते निघून गेले. पाणी आणखी चढले. देवभक्त बुडू लागला. आयुष्यभर केलेल्या भक्तीचा हवाला देत वाचवायला येत नसल्याबद्दल देवाला शिणू लागला. मग शिव्या देऊ लागला.<br />देव प्रकटला. म्हणाला, "" शिव्या का देतोस. तुला वाचवायला मी गाड्या घेऊन आलो, होड्या घेऊन आलो, हेलिकॉप्टर घेऊन आलो. तू आला नाहीस.''<br />देवभक्त म्हणाला, ""तू कुठे आला होतास? आले होते माझे मित्र, गावकरी, सैनिक.''<br />देव ""म्हणाला, त्यांच्या रूपाने मीच तर आलो होतो!''<br /><br />(प्रसिद्धी ः 24 जानेवारी 2010)sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-82339835719530020132010-02-27T01:34:00.000-08:002010-02-27T01:36:50.862-08:00टेन्शनचे काम नाहीपणजीत साहित्य संस्कृती संमेलन सुरू आहे. संमेलनाध्यक्ष माधवी देसाई यांनी "बिझी' आणि "टेन्शन' हे दोन शब्द हद्दपार करण्याचे आवाहन लेखकांना केले. त्यांचे भाषण तिकडे चालले होते, नेमके त्याचवेळी मी इकडे कार्यालयीन कामात "बिझी' झाल्याने तिकडे जाऊन मला काही ते ऐकता आले नाही. पण मी त्याचे "टेन्शन' न घेता दुपारी संमेलनाच्या एका कार्यकर्त्याने आणून दिलेले त्यांचे लेखी भाषण वाचून काढले.<br /> <br />खरे तर गोव्याच्या संस्कृतीमध्ये, खास गोमंतकीय म्हणून जी जीवनशैली आहे, तीत "बिझी' आणि "टेन्शन' या शब्दांना मुळातच स्थान नाही. नसलेल्या या शब्दांना हद्दपार करण्याचा प्रश्न येतच नाही. पण, माधवी देसाई म्हणाल्या ते खोटेही नाही. या शब्दांनी गोमंतकीयांची नजर चुकवून त्यांच्या जीवनात कुठेतरी चंचुप्रवेश केला आहे. काही ठिकाणी अतिक्रमण केले आहे. काहींनी सताड दार उघडून त्यांचे स्वागतही केले आहे. तात्पर्य, हे मुळातले उपरे शब्द गोवेकरांच्या जीवनात घुसलेले आहेत. बदलती जीवनशैली आणि तिला अंगीकारण्याचा मोह, काहींच्या बाबतीत नाइलाज असेल, यामुळे "बिझी', "टेन्शन' हे शब्द आणि त्याचे परिणाम आमच्या जीवनात डोकावू लागले आहेत. जीवनशैलीचे परिणाम म्हणून रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या शारीरिक आणि ताण, डिप्रेशन यांसारख्या मानसिक आजारांनी घराघरांत हातपाय पसरले आहेत. आधी आजार ओढवून घ्यायचे आणि नंतर त्यावर उपचार करीत बसायचे, अशी नवी जीवनशैली आता रुळते आहे. ताण हा यातला सर्वांत जास्त हातपाय पसरलेला आजार आहे. ताण आला की मग त्यावर उतारा म्हणून ताण व्यवस्थापन, त्यासंबंधी व्याख्याने, योग, ध्यानधारणा किंवा अन्य प्रकारचे कोर्सेस हे सगळे सध्या जोरात सुरू आहे. <br /><br />काही दिवसांपूर्वी एक अंकज्योतिषी भेटला. आधुनिक होता. त्याच्या विचाराची सारी बैठक विज्ञाननिष्ठ होती. अंकज्योतिष हा त्याचा छंद होता. तोही ताणावर मात कशी करायची असते याविषयी बराच वेळ बोलत होता. त्याचे ऐकून घेतले. मी ताण व्यवस्थापनातला तज्ज्ञ नसल्याने ऐकून घेण्याशिवाय माझ्यापाशी पर्याय कुठे होता. त्याला पुरे म्हणून थांबवणे शक्य होते, पण ते शिष्टाचारात बसत नव्हते. शिवाय, मी ज्या स्वरूपाचे काम करतो, त्याचा माझ्यावर प्रचंड ताण पडत असल्याचे मानून, त्यातून मला मार्ग दाखवण्यासाठी तो अतिशय आपुलकीने बोलत होता. त्याच्या भावना का दुखवायच्या? त्याचे बोलून झाल्यावर, खूप वर्षांपूर्वी "चांदोबा'त वाचलेली एक गोष्ट मी त्याला सांगितली, ती अशी ः<br /><br />बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'<br />वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते. <br /><br />नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती! <br /><br />(प्रसिद्धी ः दै. गोमन्तक, 17 जानेवारी 2010)sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-59357499217698783312010-02-27T01:30:00.000-08:002010-02-27T01:33:40.426-08:00सलामनव्या वर्षासाठी शुभेच्छांचे संदेश आठवडाभर मोबाईलवर येत होते. मित्रांचे, परिचितांचे. कुठे कधी तरी गाठभेट झालेल्यांपैकी काहींनी मोबाईल नंबर शोधून शुभेच्छा पाठविल्या. त्याचे कौतुकच वाटले. अशा प्रसंगी शुभेच्छा पाठवायचा मला कायम कंटाळा. "सेम टू यू'चा संदेशही पाठविणे मला होत नाही. मला ते सारे कृत्रिम वाटते. प्रत्यक्ष भेटीत मात्र शुभेच्छांची देवाणघेवाण होते. मला या प्रकाराचा आळस असला, तरी कुणी पाठविलेला शुभेच्छा संदेश वा कार्ड मिळाले की आनंद वाटतो. त्यापेक्षा मला जो शुभेच्छा देत असतो, त्याला त्याचा जास्त आनंद वाटत असतो, याबद्दल मला खात्री आहे. त्याला आनंद वाटण्यात माझे काही कर्तृत्व नाही, तरी कुणाला आनंद साजरा करायला मिळतो हेच मला अधिक आनंददायी वाटते. माझ्याकडून प्रतिसाद जात नसतानाही जे न चुकता संदेश पाठवीत राहतात, त्यांचे तर मला अप्रूपच वाटते.(त्यात आता या लिहिण्याला निमित्त दिल्याच्या आनंदाची भर!) आपल्याला माहीत नसतेच, पण अशी किती माणसे आपल्या किती साध्या साध्या कृतीतून आपल्या जीवनात आनंद पेरत असतात ! <br /><br />आपल्या अवतीभवतीची माणसे आणि आपणही वर्षभर या ना त्या निमित्ताने शुभेच्छांची देवाणघेवाण करीत असतो. त्यात नव्या वर्षाच्या शुभेच्छांची एक गंमत लक्षात आली आहे. आपल्या देशात डझनावारी धर्म, पंथ नांदतात. त्या प्रत्येकाचे वेगळे कालगणनावर्ष आहे. त्याचे वर्षारंभ साजरे केले जातात. शुभेच्छांची देवाणघेवाण होते. त्या प्रत्येकालाच जानेवारीचा पहिला दिवस उजाडला की नववर्षाच्या शुभेच्छा मिळत असतात. एका वर्षात दोनदा नवी वर्षे आपल्या जीवनात अवतरतात. एक पहिल्या जानेवारीला आणि पाडव्याला. बॅंकेच्या खात्यात असलेले पैसे संपायच्या आधीच आणखी पैशाची भर पडल्यावर कसे सुखद वाटते! जानेवारीला मिळणाऱ्या शुभेच्छांचा उबारा ताजा असताना नव्याने भरभरून येणाऱ्या शुभेच्छा मनाची पोतडी उतू जाईपर्यंत भरून जाते. बाकी कशाने असेन नसेन, शुभेच्छांच्या दौलतीने मी तरी भरपूर श्रीमंत झालो आहे.<br /><br />नव्याचे अप्रूप सर्वांना आणि सर्व काळ असते. नवीन वर्ष साजरे करताना त्याच त्याच पठडीतल्या शब्दांतले शुभेच्छा संदेश किती काळ चालतील? दर वर्षी त्यात काही नवी रचना करण्याचे माझ्या काही मित्रांचे प्रयत्न मला जाणवत आले आहेत. त्यातला एक नमुना सांगावासा वाटतो. एका मित्राने पाठविलेला हा संदेश आहे ः <br />"2010 उजाडत आहे. तुला नवीन वर्ष आनंदाचे जावो आणि त्याचबरोबर तुला 26 जानेवारीच्या..व्हॅलेंटाइन डेच्या... होळीच्या ... पाडव्याच्या ...15 ऑगस्टच्या .. वाढदिवसाच्या ..लग्नाच्या वाढदिवसाच्या .. मुलाच्या वाढदिवसाच्या... मुलीच्या वाढदिवसाच्या .. चतुर्थीच्या.. दिवाळीच्या.. नाताळच्या ...जागतिक--- दिनाच्या... पितृदिनाच्या ... शिक्षक दिनाच्या ... बालदिनाच्या ..या-- दिनाच्या , त्या--- दिनाच्या ... हार्दिक शुभेच्छा. शुभ सकाळ.. शुभ संध्याकाळ .. शुभ रात्री...बघ, साला, रोज का ड्रामाही खतम! मी तुला शुभेच्छा देणारा पहिला. आता पुऱ्या वर्षात म्हणू नकोस, मी शुभेच्छा दिल्या नाहीत...!'<br /><br />घाऊक शुभेच्छा देण्याचा असा प्रकार याआधी कुणी केला, अनुभवला होता का?<br /><br />एक वेगळा छान संदेश आला होता.<br /><br />हा संदेश तीन लघुत्तम कथांमध्ये गुंफलेला आहे.<br />"पहिली कथा ः एकदा एका गावातील सर्वांनी पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करायचे ठरविले. प्रार्थनेच्या दिवशी सगळे गावकरी एकत्र जमले. त्यांच्यातील एकच छोटा मुलगा छत्री घेऊन आला होता.<br />ती श्रद्धा होती !<br /><br />दुसरी कथा ः तुम्ही जेव्हा छोट्या मुलाला हवेत उडविता, तेव्हा ते खिदळते, हसते: कारण त्याला माहीत असते, तुम्ही त्याला झेलणार आहात.<br />तो विश्वास असतो !<br /><br />तिसरी कथा ः प्रत्येक रात्री आपण झोपी जातो, तेव्हा दुसऱ्या दिवसाची सकाळ पाहूच याची खात्री नसते. तरी दुसऱ्या दिवसासाठी आपण काही कार्यक्रम आखलेले, काही करायचे ठरविलेले असते.<br />ती आशा असते !<br /><br />नवे वर्ष तुम्ही श्रद्धा, विश्वास आणि आशा यांसह साजरे करा.'<br />चला, कंटाळा टाकून हे दोन शुभेच्छा संदेश मी तुम्हाला फॉरवर्ड करतो.<br /><br />(प्रसिद्धीःदै. गोमन्तक, 7 जानेवारी 2010)sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-56107334788402710162010-02-05T02:29:00.000-08:002010-02-05T02:37:02.884-08:00मध्यंतरतब्बल दहा महिन्यांच्या मध्यंतरानंतर आज पुन्हा उपस्थित होत आहे.मध्यंतर वाजवीपेक्षा जास्तच लांबले आहे.त्याचे वैषम्य आहेच. पण पुरते, थांबून जाण्यापेक्षा लांबणे कधीही चांगले.मध्यंतरात बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत.आपण माणसे. आपले कार्यकलाप लांबतात, थांबतात. काळाचे तसे नाही. तो थांबत नाही, आणि लांबतही नाही.त्यामुळे त्याचे कार्यकलाप निरंतरपणे सुरूच असतात.त्यामुळे माझे मध्यंतर घडले असले,तरी काही ना काही घडत होतेच. ती काळाची देणगी आहे.काळाचा एक तुकडा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. त्याला आम्ही आयुष्य म्हणतो.काळाच्या निरंतर प्रवाहात सतत घडत असणारे काही ना काही ज्याच्या त्याच्या आयुष्याला लगडून जात असते.त्याचे सातत्य असते.ते काही लांबत नाही. थांबते तेव्हा आयुष्यही थांबलेले असते.त्यामुळे बऱ्याच गोष्टी घडलेल्या असणे साहजिक आहे.त्याबद्दल अधूनमधून कधी तरी लिहायचे आहे. नव्याने सुरवात करायची आहे,त्याची ही एक प्रकारची प्रस्तावना.<br /><br />गेल्या महिन्यात थोड्या वेगळ्या शैलीत लिखाण केले. त्याचे चार ते पाच लेख "गोमन्तक"मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.ते या ब्लॉगवर टाकून नव्या प्रारंभाचा संकल्प सोडीत आहे.त्याचे मध्यंतर कधी येईल की थेट पूर्णविरामच पडेल, हे माहीत नाही.सांगताही येणार नाही. काळाकडून शिकण्यासारखी एक गोष्ट आहे.तो सारखा चालतोच आहे. त्याला भगवद्गीतेमधील शिकवण कुणी दिली असेल का ? की त्याच्या सततच्या चालण्यातूनच ती शिकवण प्रसवली गेली असेल ? काळाइतकाच गूढ, गहन असा हा प्रश्न आहे. आयुष्यात समांतरपणे चालणारे असे काही प्रश्न असतात.असावे लागतातही. ते आपल्या आयुष्याची गती राखण्यास वंगणासारखे काम करतात.प्रेरकाची भूमिकाही निभावतात. आपल्याला गवसलेले, न गवसलेलेही त्या काळालाच अर्पण करून आपण चालत राहायचे!sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-81401101593016009462009-03-24T03:52:00.001-07:002009-03-24T03:58:24.271-07:00पराभूत समाजमहाबळेश्वर येथे 82वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, संमेलनाध्यक्षाशिवायच अखेर पार पडले. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी संमेलनाच्या दोन दिवस आधीच राजीनामा दिल्याने आयोजकांना अभूतपूर्व स्थितीला सामोरे जावे लागले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला नियमांच्या चौकटीत राहून तोडगा काढणे शक्य नसल्याने राजीनाम्याबाबतचा निर्णय स्थगित ठेवून अध्यक्षांविना संमेलन पार पाडण्याचे ठरवले गेले. संमेलनाच्या इतिहासात एक नामुष्की स्वीकारून संमेलनाचा उपचार पार पाडण्यात आला. झाल्या प्रकाराबद्दल सर्वांनी महामंडळ आणि अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यावर यथेच्छ टीका केली. ती सर्वच अनाठायी नव्हती. ती पूर्णतः वाजवीही नव्हती. महाबळेश्वर संमेलनासंदर्भात जे घडले त्याचे संदर्भ आणि अर्थ महामंडळाला सर्वथा दोषी धरण्याच्या पलीकडे पोचल्याचे कुणी लक्षात घेतले नाही.<br /><br /> महामंडळ चुकले, हे खरेच. यादव यांच्या कादंबरीसंदर्भात जेव्हा वाद सुरू झाला, तेव्हाच महामंडळाने सावध होऊन भूमिका ठरवायला हवी होती. या वादामध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न करायला हवे होते. शासन तसेच समाजातील तालेवार मंडळीशी संपर्क करून वाद शमविता येईल का, याची सातत्याने चाचपणी करून तशी पावले उचलायला हवी होती. सॅन होजेच्या संमेलनानिमित्ताने अमेरिकावारीत रमलेल्या आणि मायदेशी परतल्यानंतरही त्या हॅंगओव्हरमधून बाहेर न पडलेल्या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्याचे गांभीर्य जाणवले नाही. ते स्वतःतच मश्गूल राहिले किंवा बेसावध, निष्काळजी राहिले. महामंडळाकडून चूक झाली. उणीव राहिली ती इथे. तिथे आपली जबाबदारी, कर्तव्य पार पाडण्यात त्याची कसूर झाली. नंतरची परिस्थिती त्याच्या नियंत्रणाबाहेरची होती.<br /><br /> वारकऱ्यांनी यादव यांच्या लिखाणाला आक्षेप घेऊन त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडली. तिचा शेवटपर्यंत मुकाबला करणे त्यांना शक्य झाले नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारे, एखादा अपवाद वगळता, कुणीही त्यांच्या बाजूने उभे राहिले नाही. त्यामागे यादव यांच्या वेळोवेळीच्या भूमिका होत्या. चिखलात उमलले तरी कमळ त्यापासून अलिप्त राहते, हे तत्त्वज्ञान सांगायला,ऐकायला बरे वाटते.माणसांच्या बाबतीत ते आलिप्त्य मान्य करण्याइतके समाजमन निर्भीड, मोकळे आणि उदार झालेले नाही. परस्परविरोधी विचारधारेच्या व्यासपीठावर उपस्थिती लावूनही आपण आपल्या विचारांच्या मूळ गाभ्यापासून चळलेलो नाही, असे यादव यांचे म्हणणे असले आणि कदाचित ते खरे असले, तरी ते समाजाच्या पचनी पडलेले नाही. कलावंताच्याबाबतीत यादव यांनी यापूर्वी केलेल्या लेखनाची पार्श्वभूमीही ते एकटे पडण्यास कारण ठरली असावी.त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आणि तरीही वारकऱ्यांचा दबाव कमी न झाल्याने अखेरीस राजीनामा दिला.पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महामंडळाला घटनेतील तरतुदीनुसार किमान सात दिवसांचा अवधी हवा होता. तेवढा अवधी हाताशी नव्हता.( यावर कुणी म्हणेलही,की अमेरिकेतले संमेलन कुठे नियमानुसार घेतले होते.ते नियमानुसार नव्हते म्हणून त्यावर टीका करायची आणि आता नियमाचा महामंडळाचा हवाला झिडकारण्यासाठी नियम न पाळून केलेल्या गोष्टीचा दाखला देऊन टीका करायची,ही विसंगती आहे. ती स्वीकारली, तर ती कितीही लांबविता येईल आणि विषय कधी संपायचा नाही.) संमेलन पुढे ढकलणे शक्यच नव्हते. तयारी, त्यासाठी दोन-तीन महिने राबलेल्या लोकांचे कष्ट, खर्च झालेला पैसा हे सारे वाया गेले असतेच, शिवाय संमेलनासाठी रसिक लोक घरातून कधीचेच निघाले होते.निरुपायाने प्राप्त परिस्थितीत जमेल तसे संमेलन करण्याचा मार्गउपलब्ध होता. तो महामंडळाने स्वीकारला.<br /><br /> वारकऱ्यांनी आडदांडपणाने संमेलन वेठीस धरले. यादवांनी ऐनवेळी माघार घेऊनही संमेलनाची गोची केली. त्यामागे त्यांची काही वैयक्तिक कारणे, निरुपायाचे त्यांच्यावर ओढवलेले प्रसंग कारणीभूत असतील. संमेलनाचा खेळखंडोबा होण्यामागे त्यांचाही वाटा होता, ही वस्तुस्थिती आहे.<br /><br /> अध्यक्षांविना संमेलन होणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर अनेकांनी महामंडळावर टीकेचे आसूड ओढले. तीव्र प्रतिक्रिया वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त केल्या. वारकऱ्यांच्या दादागिरीला बळी पडल्याबद्दल टीकाही खूप झाली. त्या सर्व टीकाकारांचे अभिनंदन करायला हवे. तशी मते व्यक्त करायलाही शौर्य लागते. भले ती बोलणारी, लिहिणारी माणसे आपल्या मठीत सुरक्षित राहून आणि संमेलनस्थळी न फिरकता बोलत, लिहीत होती, तरीही ! त्यांना एकच सांगायला हवे,की अशा तऱ्हेच्या शौर्याने मौदानावरची लढाई जिंकता येत नाही. यादवांच्या अध्यक्षतेखालीच संमेलन घेण्याचा निर्णय करून अट्टहासाने तो राबविण्याचा प्रयत्न केला असता तर काय, काय झाले असते ? एक तर यादव यांनी ते मान्य केले नसते. किंवा ते तयार झाले असते आणि समारंभात वारकऱ्यांनी किंवा त्यांच्या नावे कुणीही संमेलनस्थळी, संमेलन मंडपात नुसती कुणी संमेलन उधळायला येत आहे अशी हूल उठविली असती आणि उपस्थित माणसे सैरभैर होऊन पळापळ सुरू झाली असती, त्यात काहींना इजा झाली असती ,तर .... असे घडलेही नसते. कदाचित बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी उपद्रव माजवू पाहणाऱ्यांना आवरलेही असते. पण विपरिताची कल्पना केली, तर कुणाच्या तरी जिवाची जोखीम किंवा कुणाला गंभीर इजा होण्याचा धोका पत्करावा लागला असता. ते योग्य नव्हते. स्थानिक आयोजक तर तशी कल्पनाही करायला तयार नव्हते. प्रतिबंधक उपायाची वेळ कधीच निघून गेली होती. त्या हतबलतेत हे संमेलन झाले.<br /><br /> वास्तविक, थोडे खोलात जाऊन विचार केला,तर असेही लक्षात येईल,की आयोजन समितीवर मंत्रिवर्य रामराजे निंबाळकर स्वागताध्यक्ष होते. आणखीनही चार आमदारांचा आयोजन समितीत सहभाग होता. पतंगराव कदम यांच्यासारख्या प्रभावशाली मंत्र्याचा पाठिंबा होता. तरीही वारकऱ्यांची दादागिरी किंवा आडमुठेपणा रोखला जाऊ शकला नाही. महाराष्ट्र सरकारलाही काही भूमिका बजावता आली असती. त्यासाठी कुणी त्याला साकडे घालायलाच हवे होते, अशातला भाग नाही. वाद संमेलनाच्या, एखाद्या पुस्तकासंदर्भातला असला, तरी घडणाऱ्या घडामोडी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकणाऱ्या होत्या. त्यासंबंधी गुप्त माहिती गोळा करून स्वतः कार्यप्रवण होणे हे शासनाचे कर्तव्य ठरते.पण, या सर्वांनी निवडणुकांच्या फलिताचा विचार केला असणार. संमेलन काय, असे नाही तर तसे, होऊन जाईल, परंतु वारकरी वर्ग दुखावला, तर मोठ्या प्रमाणात मते दुरावतील,ही भीती त्यांना पडली असणार. त्यामुळेही हे कुठलेही घटक पुढे सरसावले नाहीत. त्यामुळे संमेलन ज्या स्थितीत पार पडले, ती केवळ महामंडळाला नामुष्की आणणारी गोष्ट नाही, तर तो संपूर्ण समाजाचा पराभव आहे.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-83200590940592438172009-03-18T03:54:00.000-07:002009-03-18T03:57:59.050-07:00संमेलनाचा वादसंत तुकाराम यांच्याबद्दलचा काही मजकूर आक्षेपार्ह वाटल्याने आक्रमक बनलेल्या वारकऱ्यांच्या संतापापुढे आनंद यादव यांना अखेर माघार घ्यावी लागली आहे. महाबळेश्वर येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना यादव यांनी नियोजित अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने संमेलनाच्या इतिहासात अभूतपूर्व प्रसंग उभा राहिलेला आहे. आनंद यादव यांच्या लिखाणातील आक्षेपार्हता, वारकऱ्यांची त्यांना न साजणारी अट्टहासी आक्रमकता याची ही परिणती एकंदर सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात अतिशय दुर्दैवी आणि धोकादायक घटना आहे.<br /><br /> आनंद यादव यांनी तुकाराम यांच्या संदर्भात लिहिलेला मजकूर आक्षेपार्ह आहे. कलावंत आणि साहित्यिकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करूनही तसे लिहिणे चुकीचे आहे, असे मला वाटते.समाजामध्ये विभूतिपदाला पोचलेली व्यक्ती पूर्वायुष्यात इतरांसारखी सर्वसामान्य असू शकते, या गृहितकाशिवाय त्या लिखाणाला काही आधार दिसत नाही. तरुण वयातील मुले तारुण्यसुलभ भावनाविकारांच्या आहारी जातात,भल्याबुऱ्याची पोच नसल्याने गावगप्पात रमतात, स्त्रैण-लैंगिक विषयात रस घेतात. तरुणाईचे हे सर्वसाधारण रूप असू शकते. संत तुकाराम हे अशा सर्वसाधारण तरुणांपैकीच होते, असे आनंद यादव यांनी आपल्या कादंबरीत सुचविले आहे. पंढरीची वारी करून आल्यानंतर आत्मबोधाची जी प्रचिती तुकरामांना आली, त्यावेळी आपल्या वर्तनाविषयी ते अंतर्मुख झाले.त्यावेळी मनात चाललेले विचारमंथन स्वगत स्वरूपात प्रकटले आहे. त्या मजकुरातून तुकारामाची चुकीची प्रतिमा रंगवली गेली, त्यांच्या व्यक्तिमत्व चुकीचे रेखाटले गेले, असा या लिखाणाविषयीचा आक्षेप आहे. तुकारामाच्या व्यक्तिमत्वाविषयी जनमानसात असलेल्या रूढ प्रतिमेला तडा देणारे हे लिखाण आहे. त्यामुळे आक्षेप अनाठायी नाही. एखाद्या थोर पुरुषाविषयी चरित्रात्मक कादंबरी लिहिताना त्यांच्या जीवनरेखाटनात काही रिकाम्या जागा आपल्या कल्पनेने, प्रतिभेच्या जोरावर भरायची मुभा कलावंताला असली,तरी त्यामुळे चरित्र नायकाच्या रुढ प्रतिमेला धक्का पोचत असेल, आणि कल्पनेने भरलेल्या रंगांना पक्क्या पुराव्याचा आधार नसेल, तर कलावंताचे असे स्वातंत्र्यही मान्य करता येणार नाही. स्वातंत्र्य; अभिव्यक्तीचे असेल अथवा अन्य कशाचेच; त्यालाही वाजवी निर्बंध लागू असतात. ते अमर्याद आणि अनिर्बंध असू शकत नाही. आक्षेपार्ह लिखाणाबद्दल माफी मागून यादवांनीच मुळात त्याला तसा आधार नसल्याचे मान्य केले आहे. दुसरी बाब अशी, की कादंबरी म्हणून लिहिले गेले असेल, तरी संबंधित मजकूर कल्पनेच्या भराऱ्याच्या स्वातंत्र्याची जाणीव ओलांडून केवळ मजकूर म्हणूनच पुढे नोंद होत जातो. संबंधित व्यक्तीच्या चरित्राचाच तो "अस्सल' भाग मानला जाण्याची हरेक शक्यता असते. त्यामुळे तिऱ्हाईतांसाठी, ज्यांना तुकाराम मुळात माहीत नाही, अशा वर्गामध्ये हा मजकूर कल्पनेचा भाग न राहता वास्तवाचा भाग बनून जातो.परिणामी संबंधित विभूतीविषयी चुकीचे चरित्र रूढ होण्याचा धोका त्यातून निर्माण होतो.यासाठी यादव यांच्या लिखाणातील संबंधित मजकूर समर्थनीय ठरत नाही.<br /><br /> वारकऱ्यांनी संबंधित लिखाणाला आक्षेप घेणे समजता येते. परंतु, मूळ आक्षेपाच्या पलीकडे जाऊन जी भूमिका त्यांनी अट्टहासाने पुढे चालविली आहे ती मुळीच समर्थनीय नाही. यादव यांनी आपली चूक मान्य करून दोनदा माफी मागितली. माफीपत्र लिहून दिले. अखेरीस वारकऱ्यांच्या दबावापुढे झुकून राजीनामा दिला. त्यावर हा तुकोबा- ज्ञानोबा यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया वारकरी मंडळीनी व्यक्त केली आहे. खरे तर या दोन्ही संतश्रेष्ठांचा हा पराभव आहे. रात्रंदिन त्यांचा नामजप करणाऱ्या वारकऱ्यांनी तो घडवून आणलेला आहे. या ना त्या निमित्ताने ज्यांनी सतत छळ केला, त्यांनाही ज्ञानोबा- तुकोबांनी सहृदयपणे क्षमा केली.त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी संतांच्या या थोरपणाचे भान सोडलेले दिसते.<br /><br /> यादव यांच्या लिखाणाला आक्षेप घेतल्यानंतर, त्यांनी माफी मागितली.पुस्तकही मागे घेतले.तेव्हा खरे तर विषय संपायला हवा होता. हट्टाला पेटून वारकऱ्यांनी त्यानंतरही यादव यांच्या राजीनाम्याचा राजीनाम्याचा हट्ट धरला,संमेलन होऊ न देण्याची धमकी दिली. हा वारकऱ्यांचा अतिरेक आहे.आनंद यादव लोकशाही निवडणूक प्रक्रियेतून संमेलनाध्यक्ष निवडले गेले आहेत. त्यांची निवड केवळ एका पुस्तकाच्या आधारे झालेली नाही. त्यांच्या एकूण साहित्यनिर्मितीचा, साहित्य सेवेचा विचार करून त्यांची निवड झाली आहे.संमेलन हा मराठी साहित्याचा, कोट्यवधी साहित्यप्रेमींचा उत्सव आहे. तो एकट्या यादवांचा कार्यक्रम नाही. त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडून वारकऱ्यांनी साहित्य महामंडळ, आयोजक संस्था मराठी साहित्यप्रेंमी, साहित्य जगत या सर्वांनाच वेठीला धरले आहे. आपल्या संघटितपणाचा फायदा उठवून लोकशाहीत इतरांना असलेल्या हक्कांवर ते गदा आणीत आहे. आपण म्हणू ते मनवून घेण्याचा आडदांडपणा त्यांनी चालविला आहे. महामंडळ आणि आयोजकांनीच नव्हे, तर सर्व मराठी माणसांनीही या दादागिरीचा निषेध करायला हवा.संत तुकाराम ही वारकऱ्यांची मक्तेदारी नाही,हेही त्यांना ठणकावून सांगायला हवे. या प्रकारे संमेलनाची वासलात लावता येते, असे दिसले तर उद्या उपद्रवमूल्य असलेले कुणीही घटक, संघटन मनमानी करायला पुढे सरसावल्याशिवाय राहणार नाही. वाद उकरून काढायला कुठलेही निमित्त पुरेसे ठरेल. महामंडळालाच नव्हे तर अन्य कुणालाही अशा स्वरूपाचे साहित्यिक,सांस्कृतिक अभिसरणाचे उपक्रम निश्चिंतपणे राबविता येणार नाही.अनिष्ट प्रवृत्तीच्या ध्रुवीकरणाला वाट मिळून सामाजिक जीवनातही त्याचे विपरीत परिणाम होतील. महाबळेश्वर संमेलनानिमित्ताने उफाळून आलेला हा वाद पुढील काळातील धोक्याकडे इशारा देणारा आहे. त्याचा पाया आताच नष्ट करायला हवा.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-24911527238983580762009-03-17T04:48:00.000-07:002009-03-17T04:50:55.204-07:00विजय कुणाचा ?पाकिस्तानातील राजकीय संघर्षाचा अध्याय सोमवारी नाट्यमयरीत्या संपुष्टात आला.सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश इफ्तेकार चौधरी यांच्यासह अन्य पदच्युत न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती करण्याची घोषणा पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी सकाळी केली. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अन्य मागण्यांबाबतही विचार करण्याचे त्यांनी जाहीर केले. सरकारची ही भूमिका जाहीर होताच शरीफ यांनीही "लॉंग मार्च ' मागे घेतला आणि संघर्षासाठी इस्लामाबादेची वाट चालणारी पावले थांबून माघारी वळत जल्लोषात गुंतून पडली. सरकारने ऐनवेळी नमते घेतल्याने एक मोठा संघर्ष टळला. मात्र, या नाट्यमय घडामोडीतून पाकिस्तानची लोकशाही खरेच बळकट झाली का, हा प्रश्न निर्णायक उत्तराच्या प्रतीक्षेत राहील.<br /><br /> शरीफ बंधूंना निवडणुका लढविण्यास अपात्र ठरविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि पाकिस्तानातील या ताज्या राजकीय संघर्षाला तोंड फुटले. खरे तर या संघर्षाची बिजे पाकिस्तानात मागील वर्षी लोकशाही सरकार स्थापन झाले, त्यावेळच्या सत्ताधिकाराच्या वाटप व्यवस्थेच्यावेळीच पडले होते. न्यायालयाचा निकाल हे निमित्त ठरले. शरीफ हे काही झाले, तरी झरदारी यांच्यापेक्षा नक्कीच अधिक मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी चतुरपणे न्यायाधीशांच्या पुनर्नियुक्तीच्या मुद्द्याची चावी वापरून संघर्षाला तोंड फोडले. पंजाब प्रांतामध्ये असलेल्या आपल्या प्रभावाचा पुरेपूर वापर केला. सरकार त्यांच्याविरुद्ध कारवाईचे इशारे देत असतानादेखील सरकारचे चुकीचे निर्णय न पाळण्याचे आवाहन त्यांनी पोलिसांना केले. काही पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसादही दिला. नजरकैदेचा आदेश झुगारून शरीफ आंदोलनात उतरले. सरकारच्या इशाऱ्यांना न जुमानता आंदोलकांची आगेकूच सुरू राहिली,तेव्हाच ते अनावर असल्याची, शासनाला जुमानणार नसल्याची जाणीव झरदारी यांना झाली. पंतप्रधान गिलानी आणि अमेरिकेचा शह मिळालेले लष्कर प्रमुख अश्फाक कयानी यांनी चर्चेतून झरदारी यांच्यावर दबाव वाढविला. त्यापुढे झरदारी यांना नमते घ्यावे लागले आणि एक मोठा संभाव्य संघर्ष टळला.<br /><br /> पाकिस्तानमधील संपूर्ण नाट्यात अमेरिकेच्या मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आपल्या दहशतवादविरोधी लढाईत पाकिस्तानचा सहभाग तिला आवश्यक वाटतो.पाकिस्तानमधील लोकनियुक्त, परंतु झरदारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर अमेरिका भिस्त ठेवू शकत नाही.दहशतवाद फोफावण्यात लष्कराचा हात असला, तरी त्याला बाजूला ठेवूनही तो लढा पुढे नेता येणार नाही आणि त्याला फार जवळ करूनही चालणार नाही, अशी काहीशी विचित्र अवस्था अमेरिकेच्या पवित्र्यामागे जाणवते. स्वतःच मंदीच्या फेऱ्यात अडकल्याने पाकिस्तानचे घर सगळे ठाकठीक करण्याइतका वेळ देणेही अमेरिकेला शक्य नाही. त्यामुळे आहे ती व्यवस्था सर्वांना चुचकारून, आवश्यक तेवढी कानउघाडणी करून, थोडासा दम देऊन चालू ठेवण्याचा पर्याय तिने स्वीकारल्याचे दिसते.पाकिस्तानातील सध्याचा पेच मिटला आहे. त्या प्रक्रियेमध्ये लष्कर आणि अमेरिका यांनीच निर्णायक भूमिका बजावली आहे आणि राजकीय पटावरील प्रमुख घटकांना ती मान्य करावी लागली आहे.ताज्या घडामोडीतून झरदारी यांची शक्ती -प्रभाव क्षीण झाल्याचे, शरीफ यांचा प्रथमदर्शनी विजय झाल्याचे दिसले असले,तरी हे दोन्ही घटक लोकशाहीचे आधार असतील,तर पाकिस्तानमधील लोकशाही याने बळकट झाली किंवा विजयी झाली, असे म्हणता येणार नाही.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-32287812638362500402009-03-16T04:12:00.001-07:002009-03-16T04:16:55.191-07:00वंचितांचे शिक्षणआपल्या देशात शिक्षण हा मूलभूत हक्क मानलेला आहे.नर्सरी, केजीचे आता रूढ झालेले प्रवाह सोडले, तर मूल सहा वर्षांचे झाल्यापासून त्याच्या शिक्षणाचा विचार देशाच्या व्यवस्थेने केलेला आहे. कुणी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना, कार्यक्रम राबवीत असते. सर्व ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी खटाटोप करीत असते. शासकीय आणि खासगी क्षेत्रातून होणाऱ्या प्रयत्नांतही (त्यातील व्यवसायाचे अंग बाजूला ठेवू) शासन आपला सहभाग देत असते. तरी देशातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत शिक्षण पोचविणे ही सुकर गोष्ट राहिलेली नाही. त्यामागे देशातील जनतेच्या सामाजिक, भौगोलिक आणि महत्त्वाच्या म्हणजे सांपत्तिक स्थितीसंबंधीची कारणे आहेत. देशाच्या विकासदराच्या चर्चा खूप प्रभावी होत असल्या आणि समृद्दीच्या काही पायऱ्या सर केलेल्या असल्या, तरी खूप मोठी लोकसंख्या विकास आणि समृद्दीच्या चकचकाटापासून दूरच आहे, ही देखील याच मातीतली विदारक स्थिती आहे. ती एका दिवसात आणि एखाददुसऱ्या निवडणुकीतून पालटणे शक्य नाही. हातावर पोट आणि डोक्यावर छत घेऊन जगणाऱ्या लोकांची संख्या कोटींच्या घरात आहे. ग्रामीण, आदिवासी भागातच नव्हे, तर मुंबईसारख्या महानगरी परिवेशात सुद्धा हा वंचित भारत दृश्यमान आहे.राबल्याशिवाय ज्यांच्या हातातोंडाची गाठ पडण्याची शक्यताच नाही, अशा माणसांना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करायला फुरसतच कुठे असणार? काम मिळेल तिथे धावाधाव करणाऱ्यांना राहण्याचा ठिकाणाच नसेल, तर ते आपल्या मुलांना कुठल्या शाळेत पाठविणार, आणि शिकवणार कसे ? सरकारी यंत्रणेच्या सुस्त अजगराची अशा प्रश्नांच्या चाहुलीने तर कूस वळण्याचीही शक्यता नाही. अशा भटक्या, ठावठिकाणा नसलेल्या, वंचित जीवन जगणाऱ्यांच्या शिक्षणाची सरकारला काळजी नाही, अशातला मात्र भाग नाही. घोषणांत आणि कागदोपत्री उपक्रमात त्याची बऱ्यापैकी दखल सरकारने घेतलेली असते. त्याची कार्यवाही कितपत प्रभावीपणे होते,हा भाग अलाहिदा. अशा परिस्थितीत सेवाभावी, बिगर सरकारी संस्था, व्यक्ती हा वंचित समाजाचा मोठा आधार असतो.केरळने शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय जाहीर केले, तेव्हा अनेक सेवाभावी तरुण कार्यकर्त्यांनी वाड्यावाड्यांवर जाऊनच नव्हे, तर मासेमारी करणाऱ्यांच्या पडावावर जाऊनही अक्षराकडे आयुष्यात कधी नजर न वळविलेल्या मच्छीमारांनाही अक्षरे गिरवायला लावली होती. अशी सेवाभावी, ध्येयवेडी माणसे आजही वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. वंचितांच्या उत्थापनासाठी समाजात जिवंत असलेला हा सेवाभावच खरा आशेचा किरण आहे. समर्पितपणे कार्य करणाऱ्या अशा घटकांना सरकार, समाजातील सधन, आस्थेवाईक घटकांनी आधार द्यायला हवा. तरच आशेच्या किरणांचा प्रकाश सर्वत्र पसरू शकेल.<br /><br /> एक बातमी (एशियन एज) वाचनात आली. मुंबईतील वर्सोव्हा येथे आशा किरण ट्रस्ट नावाची बिगर सरकारी संस्था गेली तेरा वर्षे झोपडपट्टी आणि पदपथांवर राहणाऱ्यांच्या मुलांना शिकवण्याचे काम करीत आहे. पदपथावरच्या सावलीत ही शाळा भरते. उन्हे वाढून त्या ठिकाणी आली, की सावली असलेल्या पुढच्या ठिकाणी शाळा सरकते. आतापर्यंत या संस्थेने दोन हजार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची वाट दाखवून दिली आहे. परंतु, शाळा चालविण्यासाठी पुरेसा निधी संस्थेकडे नाही. शाळेत येणाऱ्या मुलांना आहार देण्यासाठी येणारा खर्च मोठा असतो. नाश्ता-न्याहारी हा गरिबांच्या मुलांना शाळेकडे वळविणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकार, राजकारणी, चित्रपट अभिनेते, सधन नामवंत यांना देणग्यासाठी संस्थेने साकडे घातले, त्याचा उपयोग झालेला नाही. आर्थिक मदत मिळाली नाही, तर संस्थेला हे कार्य पुढे नेणे शक्य होणार नसल्याचे ट्रस्टचे सदस्य प्रोफेसर कृष्णदेव शर्मा यांचे म्हणणे आहे.<br /><br /> मुंबईसारख्या महानगरीत एका चांगल्या कार्याला निधीचा तुटवडा भासावा, हातभार लावायला कुणी पुढे येऊ नये, ही वैषम्य वाटायला लावणारी गोष्ट आहे. मुंबईतील झोपटपट्टीतल्या जीवनावर आधारित "स्लमडॉग मिलिअनेर' या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यावर साऱ्या देशभर त्याचीच धूम माजली होती. त्यात काम केलेल्या मुलांना स्थानिक प्रशासनाने राहण्यासाठी फ्लॅटचा पुरस्कार बहाल केला. या चित्रपटाची वाखाणणी होत असताना देशातील दारिद्रयाचे दर्शन घडविल्याबद्दल अनेकांनी नाकेही मुरडली होती. "स्लमडॉग' या शब्दालाही काहींनी आक्षेप घेतला होता." कॉंग्रेसने देशात प्रदीर्घ काळ राज्य केले, परंतु देशाची प्रगती त्याला साधता आली नाही. म्हणून झोपडपट्टया उभ्या राहिल्या,म्हणून स्लमडॉग मिलिअनेर चित्रपट बनविता आला, म्हणून त्याला ऑस्कर मिळाले.त्या पुरस्काराचे श्रेय कॉंग्रेसला द्यायला हवे', अशी खोचक टीका भाजपचे नरेंद्र मोदी यांनी केली होती. एकमेकांचे वाभाडे काढण्यात, दूषणे देण्यात यांना मोठा धन्यता वाटते. स्लम्स उभे राहणार नाहीत याची काळजी वाहणारे कोणते कार्यक्रम त्यांच्याकडे आहेत, याविषयी मात्र कुणाकडे समाधानकारक उत्तर नसते.केवळ आश्वासनांच्या शब्दांची तकलादू मलमपट्टी तेवढी असते. काही शब्द - विशेषणांवरून अनेकांच्या संतापाचा उद्रेक होतो. त्या शब्दाच्या वास्तवातून संबंधितांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणदानासारखा मार्ग कुणी चोखाळीत असेल, तर त्याकडे उपेक्षेने पाहणाऱ्या शासन यंत्रणेविरुद्ध संतापाचे शब्द प्रकटत नाहीत. वंचितांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शिक्षण हे साधन ठरू शकते. सगळ्यांनाच "स्लमडॉग मिलिअनेर'चे भाग्य लाभणार नाही. त्यांना फ्लॅट नको, किमान त्यांना शिक्षणाचे साधन उपलब्ध करून देणाऱ्यांवर थोडी मेहेरनजर वळविण्याचे औदार्य फ्लॅटची बक्षिसी देणाऱ्यांना दाखवायला काय हरकत आहे! कदाचित त्यामुळे प्रसिद्धीचा झोत त्यांच्यावर वळणार नाही, पण त्या वंचितांना विद्यार्जनाच्या मार्ग तर उजळून निघेल ! त्यासाठी, प्रोफेसर कृष्णदेव शर्मा यांच्या आर्जवाचे स्वर त्यांच्या कानांवर पडतील का ?sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-33024645316291003012009-03-13T04:00:00.000-07:002009-03-13T04:02:29.933-07:00तोकडा पर्यायकॉंग्रेस आणि भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या हेतूने आठ राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे. कर्नाटकातील दोब्बेसपेट येथे दीडेक लाखाच्या गर्दीच्या उपस्थितीत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या स्थापनेचा कार्यक्रम पार पडला. तिसऱ्या आघाडीला केंद्रात सत्तास्थानी पोचविण्याचे स्वप्न असल्याचे देवेगौडा यांनी यावेळी सांगितले. कॉंग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्याचे आणि केंद्रातील सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे जाहीर करण्याचे प्रयत्न याआधीही झाले आहेत. परंतु एक समर्थ राजकीय शक्ती म्हणून आजवर तिसरी आघाडी कधीच उभा राहू शकलेली नाही. आताही पंधराव्या लोकसभेसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यात आली आहे. प्रत्यक्षात निवडणुका होऊन निकाल जाहीर होईपर्यंत दोन महिन्यांचा कालावधी जायचा आहे. या काळात अनेक स्थित्यंतरे घडू शकतात. आता असलेल्या आघाडीमध्ये चार साम्यवादी पक्ष आणि तेलगू देसम, तेलंगणा राष्ट्रीय समिती, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भजनलाल यांचा हरियाना जनहित पार्टी या पक्षांचा समावेश आहे. मायावती यांचा बहुजन समाज पार्टी आणि जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष आघाडीत सामील झालेले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी आघाडी स्थापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.ते पुढेमागे आघाडीचे घटक बनतील किंवा आघाडीबरोबर असतील, असे सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्षाशी नुकतीच फारकत घेतलेला नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दलही आघाडीचा घटक बनलेला नाही. त्यालाही आघाडीत आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आघाडी बांधणाऱ्यांचा आवेश आणि जोर मोठा आहे. लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसेपर्यंतच्या काळात तो किती टिकतो आणि त्याला किती फाटे फुटतात हे दिसेलच. ही आघाडी फुगून वाढेल किंवा निवडणूक निकालानंतर प्रत्येक घटक आपल्या सोईनुसार नव्या सोयरिकीच्या तजविजीत गढून जाईल. आघाडीत सध्या सामील झालेल्या पक्षाचे विशिष्ट राज्यांपलीकडे मुळीच प्रभाव नाही. आघाडी आकाराला आणण्यासाठी सातत्याने खटाटोप करणाऱ्या प्रकाश कारत यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ राज्यातच मार्क्सवाद्यांच्या आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. दोन राज्यांपलीकडे देशात मार्क्सवाद्यांचे तसे प्रभावक्षेत्र नाही. चंद्राबाबू नायडू, देवेगौडा यांचा देशावर करिष्मा नाही. अन्य पक्षाचे अस्तित्वही विशिष्ट भौगोलिक प्रदेशापलीकडे जात नाही. अशा मर्यादित प्रभाव असलेल्या पक्षाची आघाडी कॉंग्रेस आणि भाजपला पर्याय देण्यास मुळातच किती समर्थ आहे, हा प्रश्न आहे.<br /><br /> जयललिता आणि मायावती या पक्षाची जोड आघाडीला मिळण्याची शक्यता आहे किंवा तसे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात असले,तरी अम्माचे राजकारण व्यक्तिहितकेंद्री आहे. आपल्या सोयीनुसार त्यांच्या राजकीय चाली ठरतात. आघाडीत सामील झाल्या किंवा सोबत राहिल्या तरी, ती सोबत शेवटपर्यंत त्या पाळतील याची खात्री त्यांची आजवरची राजकीय वाटचाल पाहता कुणीही देऊ शकणार नाही. मायावती या अतिशय महत्त्वाकांक्षी राजकारणी असून त्यांचा "सोशल इंजिनिअरिंग' चा फॉर्मुला यशस्वी झाल्यापासून त्या भलत्याच फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी आपली आकांक्षा आणि राजकीय वाटचालीची दिशा मुळीच लपवून ठेवलेली नाही. आताच्या निवडणुकीसंदर्भातही त्यांचे धोरण त्यांनी आधीच ठरवून टाकले आहे. त्याला मुरड घालून त्या आघाडीला अनुसरीत मार्गक्रमण करण्याची शक्यता नाही. त्यांच्या कलानुसार घेतले तर त्या आघाडीसोबत राहतील. आपल्या महत्त्वाकांक्षेत सहायक होईल तोवरच ही सोबत त्यांना उपयुक्त ठरणार असल्याने उपयुक्तता संपल्याचे दिसू लागल्यावर त्या आपल्या मार्गाने पुढे जातील हे सांगण्यासाठी फार डोकेफोड करायची गरज नाही. बिजू जनता दलाचा कल अजून स्पष्ट झालेला नाही. ज्या पद्धतीने नवीन पटनाईक यांनी भाजपला दूर केले , ते पाहता त्यांनीही काही गणिते पक्की केल्याचे स्पष्ट आहे. त्या गणितानुसार निवडणुकोत्तर परिस्थितीच्या कलानुसार प्रसंगी भाजपशी जवळीक साधता येईल अशा धोरणीपणानेच ते आपल्या पुढच्या चाली खेळणार आहेत.कॉंग्रेस आणि भाजपला काही प्रमाणात शह देण्याची ज्यांच्यात काही ताकद आहेत, असे हे पक्ष तिसऱ्या आघाडीच्या पर्यायांबाबत सावधगिरी आणि काहीशी गूढता दर्शवीत असल्याने त्यांच्यावाचून तिसरी आघाडी मोठे मैदान मारू शकणार नाही.<br /><br /> कॉंग्रेस आणि भाजप देशातील प्रमुख पक्ष असले, तरी स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे त्यांचेही सामर्थ्य राहिलेले नाही. कॉंग्रेसने पूर्वपुण्याईच्या बळावर बहुतेक काळ देशावर राज्य केले.काही झाले तरी सत्ता मिळते या तोऱ्यापायी प्रादेशिक अस्मिता आणि आकांक्षाची आवश्यक गांभीर्याने दखल घेण्याचे भान कॉंग्रेसला राहिले नाही. त्यानुसार सर्व स्तरांवर सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यात, सर्व अस्मिता - आकांक्षांना न्याय देतो आहोत, अशा विश्वास देण्यात कॉंग्रेस अपयशी ठरली. परिणामी तिचा पाया आक्रसून गेला आहे. प्रादेशिक पक्षाच्या आधाराविना सत्ता मिळविणे आणि राखणे तिला कठीण झाले आहे. भाजपची स्थिती तर त्याहून बिकट झाली आहे. यावेळी बिजू जनता दलासारख्या भरवशाच्या साथीदारानेही संबंध तोडल्याने त्याची स्थिती केविलवाणी झाली आहे.एका निरीक्षणानुसार लोकसभेच्या एकूण 545 पैकी 175 जागांवर भाजपचा उमेदवारच रिंगणात नसेल,अशी स्थिती आहे. या दोन्ही पक्षांची स्थिती दुबळेपणाची आणि देशव्यापीत्व प्रश्नांकित झाल्याने पर्यायाचा विचार मूळ धरतो आहे. परंतु, तिसऱ्या आघाडीसारख्या प्रयोगातून तसा समर्थ पर्याय उभा राहणार नाही. एक तर निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या या खटाटोपामागे काही दीर्घकालीन धोरणाचा, देशासंबंधी सर्वंकष विचाराचा अभाव आहे. आघाडीत असलेल्या घटकांची पक्षनिहाय विचारधारा आणि धोरणे भिन्न आहेत. देशाला समर्थ राजकीय पर्याय देण्याची भाषा असली,तरी कुणाला कुणाचे तरी उट्टे काढायचे आहे, असेही दिसते. सर्व खटाटोपाच्या मुळाशी असा देशाच्या दृष्टीने विधायक नसलेला अंतस्थ हेतू नांदत असतो. एकत्र आलेल्या घटकांमध्ये विचार, कार्यक्रम, नेतृत्व याबाबत एकजिनसीपणा दिसत नाही. त्यांच्या हाती सत्ता सोपवली तरी ते ती पूर्ण कार्यकाल राबवू शकतील यासंबंधी भरवसा जनतेमध्ये नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे विशिष्ट प्रदेशापलीकडे या सर्वांचे किंवा त्यांच्या पक्षाचे म्हणून काही प्रभावक्षेत्र नाही. त्यामुळे कितीही बोलबाला झाला आणि कितीही गाजावाजा केला, तरी संघटित, एकसंध असा समर्थ पर्याय तिसरी आघाडी देऊ शकणार नाही.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-3913584464728075212009-03-11T05:09:00.000-07:002009-03-11T05:11:17.694-07:00रॅगिंगची विकृतीआपल्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा घेऊन महाविद्यालयीन जीवनात पदार्पण करणाऱ्या कोवळ्या जिवांचा रॅगिंग नावाच्या विकृतीने घास घेण्याचा प्रकार थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. रॅगिंगच्या विकृतीला कोवळे जीव, त्याचे भावविश्व बळी पडण्याची संकट मालिका सुरूच आहे. या विकृतीविरुद्ध देशपातळीवर वेळोवेळी चर्चा आणि संताप व्यक्त होऊनही तिला आळा बसत नाही.हिमाचल प्रदेशमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या अमन कचरू या 19 वर्षीय कोवळ्या तरुणाचा गेलेला बळी रॅगिंगच्या भयावहतेचा ताजा दाखला आहे. आपला महाविद्यालयात छळ होत असल्याची तक्रार त्याने आपल्या पालकांकडे आणि नातेवाइकांकडेही केली होती. कुणीही गोष्टी या थराला जातील याची कल्पना केली नव्हती.महाविद्यालयीन जीवनात, वसतिगृहाच्या जीवनशैलीत छेडछाड, थोडीफार सतावणूक,चेष्टा मस्करी होतच असते, अशीच धारणा करून कुणी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. अमनच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील आणि अन्य नातेवाईकांच्या या आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. आपल्या मुलाच्या वाट्याला जे आले ते अन्य कुणाला सोसावे लागू नये,यासाठी आणि गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत लढण्याचा निर्धार अमनच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या लढ्याला काय फळ येईल,हे येणाऱ्या काळात दिसेलच.मात्र, महाविद्यालयात चालणारा रॅगिंगचा प्रकार हा मौजेकरिता चाललेली मस्करी म्हणण्याइतपत निरुपद्रवी खेळ नसतो, याचा मुलांच्या पालकांनीही गांभीर्याने विचार करायला हवा, वेळीच त्याबाबत सावधगिरीची पावले उचलायला हवीत, हे अमनच्या मृत्यूने अधोरेखित केले आहे. महाविद्यालयातील सीनियर मुले मौजेकरिता खेळ करीत असतीलही, पण तो कुणाच्या तरी जिवावर बेततो, तेव्हा तो खेळ राहत नाही, याची जाणीव पालकांसह महाविद्यालयाचेप्रशासन आणि सरकारनेही ठेवायला हवी.<br /><br /> अमनच्या मृत्यूमुळे रॅगिंगचा हा हिडिस चेहरा लोकांच्या समोर आला. असे किती तरी प्रकार देशभरातील विविध महाविद्यालयात घडतच असतात. मूकपणाने किती तरी मुले त्याला बळी पडत असतात. त्यांचे भावविश्व उद्ध्वस्त होत असते. कुणाला त्याचा पत्ता नसतो.दीडेक वर्षापूर्वी इंदूरमध्ये संगणक अभ्यासक्रम करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने रॅगिंगपुढे खचून जाऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी माध्यमात एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यात 2005 व 2006 या दोन वर्षांच्या काळात रॅंगिंगची 64 प्रकरणे माध्यमातून प्रसिद्धीस आल्याचे नमूद केलेले होते. जी माध्यमातून लोकांपर्यंत पोचत नाही अशी किती तरी प्रकरणे असतील. या 64पैकी दहा प्रकरणात विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले, 11 प्रकरणात विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले आणि तेवीस प्रकरणात विद्यार्थ्यांना इजा झाल्या होत्या. उजेडात न येणाऱ्या घटनांबाबत केवळ अंदाजच करता येतो. पण जे उजेडात येते त्यावरूनही रॅंगिंगच्या भयानकतेचा अंदाज करता येतो. कोवळ्या वयात माणसांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या विकृतीला आणि ते प्रकार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्याशिवाय त्याला आळा बसणार नाही.जिथे असे प्रकार उघडकीस येतात, त्या महाविद्यालयांवर, शैक्षणिक संस्थांवरही कारवाई व्हायला हवी. परंतु, आपल्या संस्थेत रॅगिंग होत नाही ना, यावर पाळत ठेवण्यासाठी खास यंत्रणा उभारणेही त्यांना बंधनकारक करायला हवे.<br /><br /> सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारांची गंभीर दखल घेऊन रॅगिंग हा शिक्षायोग्य गुन्हा ठरविण्यासाठी भारतीय दंड संहितेत आवश्यक कलम जोडण्याची सूचना 2005 मध्ये केली होती. रॅगिंग मानवी हक्काच्या उल्लंघनाची बाब ठरविताना त्यासंदर्भातील वेगवेगळ्या कृतीं गुन्ह्याच्या व्याख्येत आणण्यासही न्यायालयाने सुचविले होते. महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगला आळा घालण्यासाठी कॉंग्रेसच्या एका खासदाराने संसदेत खासगी विधेयक मांडले होते.त्यावर अजूनही संसदेला कायदा करता आलेला नाही. त्यामुळे रॅगिंगचे जे बळी ठरतात त्याला कायदा करणारेही जबाबदार ठरतात. अमनच्या बलिदानाने किमान त्यांना जाग यावी.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-10655884118029297382009-03-10T04:42:00.000-07:002009-03-10T04:44:49.391-07:00पाकिस्तानी लोकशाही धोक्यातपाकिस्तानात निवडणुकांनंतर स्थापन झालेल्या लोकशाही सरकारला वर्ष पुरे व्हायच्या आतच घरघर लागली आहे. त्या देशाचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा पाडाव करून माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आणि आताचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी लोकशाही सरकारची स्थापना केली. सुरवातीपासूनच या दोघांच्या युतीतील सांधेजोड अनैसर्गिक असल्याचे संकेत मिळत होते. कालांतराने त्यांच्यातील बेबनाव उघड झाला. मतभेदाची दरी रुंदावत गेली.दोघांतले संबंध इतके ताणले गेले आहेत, की नवाझ शरीफ यांनी आता उघड बंडाचीच भाषा सुरू केली आहे. पाकिस्तानात बदलासाठी क्रांतीचेच आवाहन त्यांनी केले आहे. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे पदच्युत प्रमुख न्यायाधीश इफ्तेकार चौधरी यांना पुन्हा पदासीन करण्याच्या मागणीसाठी "लॉंग मार्च 'करण्याचा इशारा देत असताना जनतेलाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.15 मार्चला लाहोरहून निघणारा "लॉंग मार्च' इस्लामाबादेत पोचल्यानंतर तेथे मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शरीफ यांच्या या कृतीच्या विरोधात सरकारनेही दंड थोपटले असून "लॉंग मार्च'च्या वेळी एकाही नागरिकाला जीव गमवावा लागला किंवा कुणाच्या मालमत्तेचे नुकसान झाले, तर शरीफ यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी दिला आहे.दोन्ही गटांची भाषा पाहता शरीफ आणि झरदारी यांच्यामध्ये प्रत्यक्षात संघर्ष पेटल्याचीच ती खूण आहे. परवेझ मुशर्रफ यांनी पदच्युत केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांसह अन्य न्यायाधीशांच्या पुनर्स्थापनेच्या मागणीतून आंदोलन पेटले होते. लोकशाहीच्या पुनर्स्थापनेचा घोष त्यातून लावला गेला. त्याचा गेल्या निवडणुकीत परिणाम दिसून आला आणि परवेझ मुशर्रफ यांना पुन्हा सत्ता हस्तगत करता आली नाही. त्याच घोषातून आता लोकशाही सरकारच्या गच्छंतीची वाट तयार केली जात असल्याचे सध्याचे दृष्य आहे.<br /><br /> शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) आणि झरदारी यांच्या पीपीपी या पक्षांनी सत्ता हस्तगत केली तरी न्यायाधीशांच्या पुनर्स्थापनेचा विषय अनिर्णितच राहिला. झरदारी आणि शरीफ यांच्यामध्ये तो मतभेदाचा कळीचा मुद्दा ठरला. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना अधिकारपद भूषविण्यास आणि त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालणारा निवाडा दिला.त्या आधारे झरदारी यांनी पंजाब सरकार बरखास्त करून तिथे गव्हर्नर नेमला आहे. खरे तर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या यासंदर्भातील निवाडाच कायम केला आहे. परंतु , शरीफ बंधूंचा प्रभाव असलेल्या पंजाब प्रांतात त्याची प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली आहे. शरीफ बंधूंना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी झरदारी यांनीच हा डाव टाकल्याचे वातावरण तिथे निर्माण झाले आहे किंवा हेतुपुरस्सर करण्यात आले आहे. त्यातून पुन्हा पदच्युत न्यायाधीशांच्या पुनर्स्थापनेचा मुद्दा शरीफ बंधूंनी पुढे आणला आहे. शरीफ बंधू एकूण प्रकरणाला उदात्त रूप द्यायचा प्रयत्न करीत असले,तरी त्यामागे सत्तेचीच गणिते आहेत. झरदारी हे इफ्तेकार चौधरी याच्या पुनर्स्थापेसाठी राजी होणार नाहीत, हे उघड आहे. त्यांना सत्तेचे सोपान चढता यावे यासाठी ज्या करारान्वये त्यांच्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे हटविण्यात आली, तेच चौधरी यांना मान्य नाही. त्यामुळे पुन्हा त्यांना प्रमुख न्यायाधीशपद बहाल केले तर ते आपल्या विरोधात कृती करतील याची भीती झरदारी यांना आहे. लोकशाही किंवा न्यायव्यवस्थेच्या प्रस्थापनेचा मुद्दा हा खरा नसून सत्ता आपल्या हातात राहावी यासाठी पाकिस्तानातल्या या प्रमुख नेत्यांमध्ये चाललेला हा संघर्ष आहे. शरीफ यांची बंडाची भाषा आणि झरदारी सरकारची कारवाईची धमकी ही तो अधिक चिघळत जाण्याची लक्षणे आहेत.<br /><br /> झरदारी अध्यक्ष असले तरी त्यांना पाकिस्तानचे एकूण प्रशासन चालविणे जमलेले नाही. प्रशासनावर त्यांची पकडही नाही.पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्याशी त्याचं पटत नाही. कुठल्याही विषयावर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नाही.राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर एक विसविशीत चित्र उभे राहिले आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे झरदारी यांना साधेल अशी चिन्हे दिसत नाहीत. एका बाजूला राजकीय अस्थिरता प्रकट होत असताना दुसऱ्या बाजूला दहशतवाद्यांचा उच्छाद त्या देशात वाढत चाललेला आहे. पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात दहशतवादी निरंकुश बनलेले आहेत. त्यावर लगाम कसण्याची कोणताही विश्वासार्ह कृती कार्यक्रम झरदारी सरकारकडे नाही. दहशतवादविरोधात लढत असल्याचा पाकिस्तान केवळ गळाच काढत आहे. प्रत्यक्षात विश्वास ठेवावा अशी कोणतीही कृती करताना दिसत नाही. त्या देशाचे लष्कर प्रमुख जनरल अश्फाक परवेझ कयानी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्या परतल्याच कारभार सुरळीत हाकण्याची तंबी त्यांना दिली आहे. त्यांचा थाट पाहिल्यावर पाकिस्तानात सत्ता कुणाची या प्रश्नातच त्याचे उत्तर सापडते. पाकिस्तानात लष्कर बंडाच्या पवित्र्यात असून ते सत्ता हस्तगत करण्याचे अंदाज गेले काही दिवस व्यक्त केले जात आहेत. जनरल कयानी यांनी लोकशाही सरकारला ठणकावणे त्या अटकळींना पुष्टी देणारे ठरते. राजकीय अस्थिरता, तालिबान शक्तींचा वाढलेला वावर आणि लष्कराचे इशारे ही पाकिस्तानातील लोकशाही धोक्यात आल्याची चिन्हे आहेत.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-15131914433093036282009-03-04T02:19:00.000-08:002009-03-04T02:22:33.212-08:00लाहोरचा इशारालाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून तेथील दहशतवाद निपटून काढण्यास पाकिस्तान सरकार असमर्थ असल्याचेच उघड झाले आहे. दहशतवादी मनमानेल तसा उच्छाद पाकिस्तानात माजवू शकतात आणि सहीसलामत निसटून जाऊ शकतात, हेही या घटनेने स्पष्ट झाले आहे.पाकिस्तानच्या भूमीत जोमाने वाढणाऱ्या दहशतवादापासून जगाला असलेल्या धोक्याचे गांभीर्यही अधिक ठळक झाले आहे.<br /><br /> खरे तर श्रीलंकेचा क्रिकेट दौरा नियोजित नव्हता. भारतीय संघाचा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानचा क्रिकेट दौरा व्हायचा होता. मुंबईत नोव्हेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दौरा रद्द केला. ती जागा भरून काढण्यासाठी आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाला संभाव्य नुकसानीतून वाचविण्यासाठी श्रीलंकेने सद्भावनेने दोन टप्प्यात या दौऱ्याला मान्यता दिली. पाकिस्तानातील सुरक्षाविषयक स्थितीबद्दल शंका असल्याने गेल्या वर्षात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनेही आपले नियोजित दौरे रद्द केले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. ही सर्व पार्श्वभूमी माहीत असताना दोन्ही देशातील संबंधाचा विचार करून हा दौरा ठरविण्यात आला. त्याची भारी किंमत श्रीलंकेच्या खेळाडूंना मोजावी लागली आहे. शारीरिक जखमा काही काळाने भरून येतील, परंतु त्यांच्या मनाला झालेल्या घावांतून सावरायला त्यांना निश्चितच खूप काळ जावा लागेल. भीतीचे सावट मनावर पसरून राहिले तर अन्यत्र खेळतानासुद्धा त्यांच्या खेळावर परिमाण जाणवू शकेल.<br /> <br /> लाहोरमधील घटनेने पाकिस्तानच्या क्रिकेटचे खूप नुकसान केले आहे. दोन वर्षांनंतर होणारी विश्वचषक स्पर्धा भारत, श्रीलंका, बांगला देश आणि पाकिस्तान यांनी संयुक्तपणे आयोजित करायची होती. चारपैकी भारत वगळता अन्य तिन्ही देशातील स्थिती सुरक्षिततेच्या बाबतीत अनिश्चिततेची आहे. लाहोरमधील घटनेने पाकिस्तानने क्रिकेटविश्वाचा भरवसा पूर्णतः गमावला आहे. साहजिकच आयोजनातून त्याला वगळले जाईल. पुढेही कुणी देश पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी आपले संघ पाठविण्याची शक्यता राहिलेली नाही.<br /><br /> क्रिकेट किंवा कुठलाही खेळ हा दोन मने, दोन समाज, दोन देश जोडणारा दुवा आहे. पाकिस्तानातही क्रिकेट हा खेळ लोकांना अतिशय प्रिय आहे. तिथे क्रिकेटपटूंवर हल्ला करून दहशतवाद्यांनी माणसे आणि मने जोडणाऱ्या दुव्यावरच घाव घातला आहे. या घटनेच्या परिणामी तिथे क्रिकेट खेळणे बंद झाले,तर त्यातून समाजाचे मोठे नुकसान होणार आहे.श्रीलंकेच्या खेळाडूंना अभेद्य सुरक्षा पुरवू न शकल्याने पाकिस्तानची देश म्हणून प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.त्याचेही नुकसान या देशाला भावी काळात सोसावे लागणार आहे.<br /><br /> दहशतवाद पोसण्याचा खेळ पाकिस्तानच्या जिवावर बेतला आहे. दहशतवाद्यांनी संपूर्ण देशात जाळे पसरले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने स्वातमध्ये तालिबानशी करार करून तेथे शरीयत कायदा लागू करण्यास मान्यता दिली होती. त्याच्या दोन दिवस आधी, तालिबान कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर कब्जा करू शकेल, अशी अगतिकता पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी व्यक्त केली होती. तालिबान कोणत्याही क्षणी कराचीचा ताबा घेऊ शकतील, असा पोलिसांचा अहवाल असल्याचे तीन चार दिवसांपूर्वी जाहीर झाले आहे. पाकिस्तानचा थोडा थोडा भाग कब्जात करीत सगळा देश आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा तालिबानचा बेत असेल किंवा त्यांची अन्य काही योजना असेल, त्याला रोखण्याचे सामर्थ्य पाकिस्तानच्या नागरी सरकारमध्ये नाही, हे प्रत्येक घटनेनंतर अधिकच ठळक होत चालले आहे.तालिबान आणि दहशतवाद्यांच्या फासात अडकून पाकिस्तान स्वतःच जर्जर झालेला आहे. जेवढे जमेल तेवढा काळ स्वतःला वाचविण्यासाठी या जर्जरतेचा पाकिस्तान सरकारने आश्रय केल्यासारखे दिसते आहे.आपल्या भूमीत पोसल्या जाणाऱ्या दहशतवादापासून भारतासह जगाला असलेला धोका दूर करण्यासाठी पाकिस्तान प्रभावी आणि परिणामकारक कारवाई करू शकेल, ही शक्यता गृहीत धरणेच आता धोकादायक आहे.लाहोरच्या घटनेचा हाच इशारा आहे.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-2168166457007488282009-03-03T02:26:00.000-08:002009-03-03T02:28:19.546-08:00कायद्याचे अराजकसत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे म्हटले जाते. खरे तर काहीच चालत नाही. शब्द चालत नाहीत आणि कायदाही चालत नाही. गोव्यात सिदाद द गोवा या पंचतारांकित हॉटेलासंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय आणि केलेली कृती याचे ताजे उदाहरण आहे. या हॉटेलचे काही बांधकाम पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महिनाभरापूर्वी दिला होता. त्याची अंमलबजावणी खरे तर सरकारने करायला हवी होती. काही घटक असे मातब्बर असतात, की सत्तेचेही त्याच्यापुढे काही चालत नाही. सत्ता त्यांच्यापुढे वाकते. ती राबविणारे त्यांच्यापुढे हतबल असतात. या प्रकरणात असेच घडले आहे. कारवाई करण्याची छाती नसल्याने सरकारने संबंधित मूळ कायद्यातच बदल केला आहे. विधानसभेत कायदा करायचा असतो. विधानसभेचे अधिवेशन नसते तेव्हा तातडीच्या बाबींसंदर्भात वटहुकमाद्वारे कायदा करता येतो. मात्र, ती बाब तातडीची आणि सामाजिक हिताची असण्याची अपेक्षा असते. सरकारला त्या अपेक्षेचे सोयरसुतक नाही. त्यांने फक्त वटहुकमाचा सोयीचा मार्ग तेवढा पत्करला आहे. न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही टाळून हॉटेलला संरक्षण देण्यासाठी वटहुकमाचे साधन वापरले आहे. कायद्यातील बदल सुमारे 44 वर्षे आधीपासून,पूर्वलक्षी प्रभावाने जारी केला आहे. लोकसभेची निवडणूक मंगळवारी जाहीर व्हायची होती. त्यासंबंधी घोषणा व्हायच्या अगोदर सर्व सोपस्कार पूर्ण करून वटहुकूम जारी केला आहे. अशी दुर्मिळ कार्यतत्परता क्वचितच पाहायला मिळते. समाजाच्या व्यापक आणि आत्यधिक हिताशी निगडित विषयाबाबत अशी द्रुतगती कार्यक्षमता सरकार कधी दाखवते का ? कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळविण्याचा प्रकल्प पूर्ण करीत आणला आहे. गोव्याला मिळणारे म्हादईचे पाणी या प्रकल्पामुळे एकदा तुटले, की गोव्याच्या हिरवाईचे वैराण वाळवंट व्हायला सुरवात होईल. त्याविरुद्धची लढाई ज्या निर्धाराने आणि पोटतिडिकेने लढवायला हवी,तशी ती लढवली जाते असे दिसत नाही. याउलट म्हादई बचाव आंदोलनाचे नेते कार्यकर्ते अधिक तळमळीने लढा देताना दिसत आहे. गोमंतकीयांच्या जीवनमरणाशी निगडित असलेल्या या विषयावरची सरकारची सुस्त चाल हॉटेलसंदर्भातील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिक ठळकपणे नजरेत येते.<br /><br /> गोव्यात किनारपट्टी भागात मच्छीमारांनी बांधलेल्या घरांचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. सीआरझेड नियमांचा भंग करून बांधलेली बांधकामे पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यापासून लोकांना संरक्षण मिळावे यासाठी काही लोकप्रतिनिधींसह संबंधितांचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर सरकार कोणताही दिलासा द्यायला तयार नाही.आता लोकसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाल्याचे निमित्त करून हा विषय बाजूला ठेवला जाईल. निवडणुकांनंतर कदाचित लोकांच्या, लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी त्यावर विचार केला जाईल. पण या हॉटेलासंदर्भात दिसलेल्या तत्परतेने तो निकाली काढला जाईल,याची खात्री नाही. हे वेगळे विषय आहेत. पण त्यातला एक मुद्दा समान आहे. तो म्हणजे न्यायालयाचे झालेले निर्णय. एका विषयामध्ये न्यायालयीन निर्णयाची कार्यवाही टाळण्यासाठी कायद्यात बदल केला गेला आहे. न्यायालयीन निर्णय व्यर्थ अथवा गैरलागू ठरविण्यासाठी कुठल्याही कायद्यात बदल करणे, तोही पूर्वलक्षी प्रभावाने, ही रीत चुकीची वाटते.ज्यावेळी असा बदल केला जातो, त्यावेळेपासून पुढे तो कायदा लागू केला तर ते समजण्यासारखे आहे. तसे नसते, तेव्हा अशा निर्णयामागील प्रामाणिकपणाविषयी, हेतूविषयी शंकेला निश्चितच जागा राहते. असे शंकेला स्थाने देणारे निर्णय गोव्यात आणि देशातही घडलेले आहेत.त्याची परंपरा निर्माण होणे "कायद्याचे राज्य' या संकल्पनेला, त्यामागील तत्त्वाला ढका देणारे आहे.हे प्रकार कायद्याचे अराजक निर्माण करणारे आहेत.त्यातून प्रशासन संस्थेविषयी अविश्वास आणि असंतोष निर्माण होतो,वाढतो. त्याचा स्फोट झाला तर मोठा विद्ध्वंस माजेल. म्हणून असे प्रकार टाळले जावेत.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-54237424535594325622009-03-02T03:03:00.000-08:002009-03-02T03:06:55.275-08:00"बहुमता'चे बदललेले संदर्भपंधराव्या लोकसभेसाठी आता लवकरच देशभरात निवडणुका होतील. सत्ताकांक्षी पक्षाबरोबर पंतप्रधानपदाची आकांक्षा व्यक्त केलेल्या नेत्यांची एरव्हीपेक्षा अधिक संख्या हे यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असेल. देशात एकाच पक्षाचे सरकार सत्तासीन होण्याचे दिवस आता मागे पडून वर्षे लोटली आहेत. कॉंग्रेसच्या मनावर त्या स्वप्नमयी दिवसांची भूल अजून आहे. तीतून बाहेर पडायला तिला जड जात असले,तरी पुन्हा ते दिवस यायला अजून किती वर्षे जावी लागतील याचे गणित मांडणेच अवघड आहे, हे वास्तवही तितकेच कठोर आहे.आगामी निवडणुकांनंतरही कुणाही पक्षाला इतरांबरोबर कडबोळे केल्याशिवाय सत्ता उपभोगता येणार नाही,हेही आताच पुरेसे स्पष्ट झाले आहे.कोण पक्ष कुणाबरोबर जाईल आणि कोण कुणाबरोबर राहील, याचेही कोणतेही अंदाज बांधणे शक्य नाही. प्रत्यक्षात निवडणुकांच्या फडात जे उतरणार आहेत आणि निवडणुकांनंतर सत्तेसाठी जे जोड-तोड करणार आहेत, त्यांनाही असा काही अंदाज सांगणे शक्य नाही. "फिक्सिंग' करणाऱ्यांना आणि त्या खेळात वाक्बगार असणाऱ्यांनाही कोडे पडावे, अशी आजची परिस्थिती आहे.<br /><br /> बहुमत असलेला उमेदवार विजयी ठरतो. त्या बहुमताचे संदर्भ जसे बदलले आहे, तसे लोकसभेतील "बहुमता' च्या आकड्याचे संदर्भही बदलले आहेत. थेट अर्थाने कुठेही बहुमत नसताना उमेदवार, (सर्वाधिक मते मिळवून) विजयी होतात आणि सर्वाधिक सदस्य घेऊन एखादा पक्ष लोकसभेत पोचला तरी तो बहुमताचा पक्ष ठरेलच, याची काही खात्री नसते. त्यामुळे अनेक पक्षांचे संख्याबळ एकत्र करून सत्तेसाठीचे बहुमत "दाखवावे' लागते. त्यासाठी ज्या तडजोडी केल्या जातात, दबावतंत्र वापरले जाते, ब्लॅकमेलिंग केले जाते, त्याने "बहुमता'चे संदर्भ आणि अर्थ बदललेले आहेत. त्याची उदाहरणे 14व्या लोकसभेच्या कालावधीत आणि त्याआधीही भाजपचे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, त्यावेळीही अनेकदा पाहायला मिळाली. 1996मध्ये केवळ 46 सदस्यांच्या संख्याबळाच्या जोरावर एच. डी. देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा बहुमताच्या संदर्भाला आणि अर्थाला वेगळे परिमाण प्राप्त झाले. तेच सत्ताकारणाच्या अंतर्गत खेळीतील अंतःसूत्र बनले. तेच आज प्रत्यक्ष मैदानातील राजकीय डावपेच आणि खेळीचे आधारसूत्र बनले आहे. ती भाषाही आता त्याच उघडपणाने बोलली जाऊ लागली आहे. कारण त्या सूत्राने पंतप्रधानपद मिळविण्यासारखी महत्त्वाकांक्षा गाठण्यासाठी आपल्या एका पक्षाला लोकसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या संख्येने खासदार निवडून आणण्याची गरज निर्णायक आणि अपरिहार्य राहिलेली नाही. त्यासाठी तेवढे प्रचंड परिश्रम करण्याची, त्या मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोचण्याची गरज राहिलेली नाही. त्या सूत्राने महत्त्वाकांक्षी राजकारण्यांना आपले स्वप्न साकार करण्याचा शॉर्ट कट बहाल केलेला आहे. ज्याच्यापाशी प्रचंड क्षमता, गुणवत्ता आहे, दूरदर्शित्व आहे, उत्तुंग नेतृत्व आहे; परंतु एवढी यातायात करून बहुमताच्या संख्येने लोकसभेत जाण्याची शक्ती नाही आणि त्यामुळे असामान्य अशा नेतृत्वाला देशाला मुकावे लागण्यासाठी स्थिती आहे, अशा नेत्याच्या दृष्टीने हे सूत्र उपकारक ठरण्यासारखे आहे.असे नेते कितीसे आहेत ? त्यामुळे, केवळ उत्तुंगतेचा आभास निर्माण करणाऱ्या खुज्या,बुटक्या, स्वार्थलिप्त नेत्यांसाठी सोय ठरू शकणारे हे सूत्र देशाच्या, लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी ठरणारे आहे. असे दुर्दैव आपल्या देशाला, आपल्या जनतेला आणखी किती वर्षे झेलावे लागेल, हा विचारच अस्वस्थ करणारा आहे.<br /><br /> गेल्या सुमारे दोन दशकांच्या कालावधीत आघाडी सरकार ही राजकीय अपरिहार्यता ठरली आहे. पुढचे किमान दशक-दीड दशक याच राजकीय अपरिहार्यतेतून व्यतीत होणार आहे. कदाचित त्याहून अधिक काळ ही स्थिती राहू शकेल. आघाडी सरकारच्या अपरिहार्यतेमध्ये प्रमुख पक्ष मानल्या गेलेल्या पक्षाचे संख्याबळ आणि सत्तेसाठीचे बहुमत यांत पातळशी राहिलेली फटही निर्णायक हत्यार ठरते. तो कमकुवत दुवा महत्त्वाकांक्षी राजकारण्यांनी नेमका हेरला आहे. आपल्या पक्षाला खूप मोठे आणि देशव्यापी करून खऱ्या अर्थाने बहुमताचे राज्य आणण्याचा लांबचा, कष्टप्रद आणि दीर्घकालीन मार्ग स्वीकारण्यापेक्षा प्रमुख पक्षांसंदर्भात राहणाऱ्या फटीचा शॉर्टकट त्यांना सोयीचा आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी उपयुक्त वाटतो. राजकीय डावपेचाचे व्यूह या सोयीचा विचार करून आखले जात आहेत. त्यांत मोठ्या राष्ट्रीय पक्षांशी स्पर्धा करण्यापेक्षा त्यांना बहुमतासाठी थोड्या जागा कमी कशा पडतील याचा विचार हे या डावपेचाचे सूत्र बनले आहे.पुढच्या अनेक वर्षात तेच पुढे चालविले जाणार आहे.<br /><br /> कॉंग्रेसला पुन्हा एका पक्षाचे म्हणजे आपले एक पक्षीय सरकार यावे असे खूप वाटते. त्यावरून त्या पक्षाने आघाडी राजकारणाची मानसिकता पूर्णतः स्वीकारली नसल्याचे म्हटले जाते. इतकी वर्षे स्वतःच्या तब्येतीने राजसत्ता उपभोगल्यावर आघाडीची मानसिकता निर्माण होण्यात वा ती स्वीकारण्यात आढेवेढे घेतले जाणारच. त्याचाही फायदा प्रादेशिक स्तरावर बलिष्ठ बनलेले पक्ष घेणार. आघाडीची मानसिकता स्वीकारण्याची अनिच्छा आणि एकपक्षीय सरकारची अनावर इच्छा असण्याने प्रश्नाचे उत्तर सापडणार नाही. आघाडी सरकार आजची अपरिहार्यता असली, तरी एकूण देशाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने त्याचे काही तोटेही आहेत. त्यावर मात करण्यासाठी कॉंग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. कॉंग्रेसला तसे वाटते, पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत,त्याबाबतीत तो पक्ष उणा पडला आहे. त्या न्यूनत्वामुळेच काही अगतिकता त्याच्या पदरी पडली आहे. एकपक्षीय सरकारच्या आपल्या आंतरिक इच्छेच्या पूर्तीसाठी ज्या प्रमाणात, ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचायला हवे होते, तसे निर्धारपूर्वक प्रयत्न न झाल्याने कॉंग्रेसने काही फरफट ओढवून घेतली आहे. त्या कोंडीतून बाहेर पडल्याशिवाय अपेक्षित निष्पत्ती हाती लागणार नाही, आणि आघाडीच्या कोंडाळ्यातून भारतीय राजकारणाची मुक्तता होणार नाही.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-8956694980503947542009-02-17T03:07:00.000-08:002009-02-17T03:09:24.713-08:00हिंसकतेची होळी कराव्हॅलेंटाईन डेला विशेष उपद्रवकारक घटना घडल्या नाहीत. काही ठिकाणच्या तुरळक घटना वगळता हा दिवस बऱ्यापैकी "प्रेमपूर्वक' साजरा केला गेला. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास विरोध करणाऱ्या घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने संस्कृतीच्या नावाखाली उपद्रव आणि हिंसाचार माजवण्याच्या योजनांना लगाम बसला. कर्नाटकातील राम सेनेला गुलाबी चड्ड्या भेट पाठविण्याच्या महिलांच्या अहिंसक निषेध मोहिमेचाही परिणाम झाला. 14 फेब्रुवारी उलटून गेल्यावर आता या चड्ड्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न राम सेनेसमोर आहे. चड्ड्या पाठविणाऱ्यांना परतीची भेट म्हणून साड्या पाठविण्याचे आधी ठरले होते. ते बहुतेक बारगळले आहे. या चड्ड्या अनाथाश्रमात पाठवायचा विचार झाला. त्यानंतर ज्या मुलींना त्या पाठविल्या त्यांच्या पालकांकडे त्या पाठवायच्या ठरले. नंतर त्यांचा जाहीर लिलाव पुकारायचा विचार पुढे आला. आता सरते शेवटी त्यांची होळी करायचे निश्चित झाले आहे. ते प्रत्यक्षात आल्यावर चड्ड्यांचा विषय संपून जाईल. परंतु संस्कृतिरक्षणाच्या आणि त्यानिमित्ताने नवीन पिढीला आपली भारतीय संस्कृती शिकविण्याच्या राम सेनेच्या आततायी प्रयत्नांमध्ये एका कोवळ्या जिवाची होळी झाली, त्याचे काय? <br /><br /> बंगळूरमध्ये एका पंधरा वर्षीय मुलीला दुसऱ्या धर्मातील मुलांबरोबर एकत्र पाहून संस्कृतिरक्षकांनी अवमानित केले. त्या मुलाला मारहाणही केली. अवमान जिव्हारी लागल्याने मुलीने दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली.त्या मृत्यूची जबाबदारी कुणीच घेणार नाही. तिच्या वडिलांनीही संस्कृतिरक्षकांच्या धाकदपटशामुळे मुलीने आत्महत्या केली नसल्याचे सांगितले आहे. त्यांना वाटले ,तरी दुसरे काही सांगता येणार नाही. मरणारा मरून गेला, जगणाऱ्याला मागे राहिलेल्या दहशतीचा मुकाबला करणे भाग असल्याने, तेवढे धाडस आणायचे कोठून असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला असेल. त्यात त्यांनी मात स्वीकारली, असे सहज अनुमान काढता येते.वडिलांनी अशी कबुली दिल्यामुळे ज्यांनी गुंडगिरी केली, ते आपसूकच मोकळे राहिले. त्यांच्या संवेदना थोड्याशाही जाग्या असतील, तर त्यांनी अशा तऱ्हेने संस्कृतीचे रक्षण करता येते का, असा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहावा.<br /><br /> भारताने अनेक परकीय आक्रमणे पचविली. आक्रमकांच्या संस्कृतीही पचविल्या. भारताने दुसऱ्यावर आक्रमण केल्याचे, आपली संस्कृती दुसऱ्यावर लादण्याचे प्रयत्न केल्याचे उदाहरण नाही. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असलेल्या आपल्या देशात दुसऱ्यावर संस्कृतीच्या नावाखाली आपले विचार लादण्याचा अट्टहास का केला जातो आहे? दुसऱ्याच्या अभिव्यक्तीचा बळाचा वापर करून संकोच करण्याची ही कुठली संस्कृती आहे ? मंगळूरमधील किंवा अन्य कुठल्याही संस्कृतिरक्षकांना दुसऱ्यांना काही संस्कृती शिकवायची असेल,तर तिची पद्धत मुळात सुसंस्कृतपणाची हवी. बळजबरी,मारहाण करणे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे काय? म्हटल्याबरोबर दुसऱ्यानेही तसेच वागले पाहिजे, हा हट्टाग्रह का ? ही असहिष्णुता का ? सहिष्णुता आणि संयम हाही आपल्या संस्कृतीचा विशेष आहे. त्या सर्वांना हरताळ फासून कुठल्या संस्कृतीचा पुरस्कार केला जात आहे ? दुसऱ्यांनी संस्कृती पाळण्याचा आग्रह धरणाऱ्यांनी आपल्या पायाकडे आधी पाहावे. तोडफोड आणि हिंसाचाराच्या मार्गाने संस्कृती शिकविता येणार नाही. ज्यांना ती शिकवायची, सांगायची आहे. त्यांची मने,विचार, भावना आधी समजून घेतल्या पाहिजेत.त्यांची संवेदनशीलता जपली पाहिजे. एखाद्याचे प्राण जाण्यासारखी स्थिती निर्माण करून संस्कृती जपता येणार नाही. संस्कृती जपण्यासाठी आधी माणसे जपली पाहिजेत,जगवली पाहिजेत. या संस्कृतिरक्षकांनी त्यासाठी गुलाबी चड्ड्यांबरोबर स्वतःमधील आततायीपणाची, अरेरावीपणाची आणि हिंसकपणाची होळी करावी.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-30337289528131391452009-02-17T02:15:00.000-08:002009-02-17T02:16:38.931-08:00नवे डावपेच गरजेचेस्वात प्रांतामध्ये शरीयत कायदा लागू करण्याची मागणी मान्य करून पाकिस्तानने तालिबानपुढे सपशेल शरणागती पत्करली आहे.तालिबान पाकिस्तानवर कधीही कब्जा करू शकेल, अशी अगतिक कबुली दोनच दिवसांपूर्वी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दिली होती. पाकिस्तान आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असल्याचे केविलवाणेपणाने सांगितले होते. लढाईचे शब्द हवेत विरण्याआधीच पाकिस्तानने शस्त्रे म्यान केली आहेत.स्थानिक तालिबानी संघटनेशी शरीयत कायदा लागू करण्यासंबंधी केलेल्या करारामुळे पाकिस्तानचा मलकंद भाग, ज्यात स्वात खोऱ्याचा समावेश होतो, शरीयतचा अंमल लागू होणार आहे. तालिबानी संघटनेने गेल्या काही वर्षात स्वात भागात उच्छाद मांडला आहे. महिलांवर शिकण्यास बंदी घातली आहे.त्यापायी अनेक शाळा जमीनदोस्त करून टाकल्या. संगीत ऐकण्यास, कोणत्याही स्वरूपातच करमणुकीस बंदी, असा त्यांचा जाच सुरू आहे. त्यांच्या अत्याचारामुळे या भागातून गेल्या काही वर्षात हजारो लोक परागंदा झाले आहेत. पाकिस्तान सरकार तालिबान्यांच्या कारवायांना पायबंद घालू शकले नव्हते.पाकिस्तानातील लष्कर आणि आयएसआयचा या शक्तींना छुपा पाठिंबा आहे.पाकिस्तानी लष्करालाही मनापासून तालिबानी शक्तींविरुद्ध लढायचेच नसल्याने त्याचा बीमोड करायचा प्रामाणिक प्रयत्न झाला नाही. त्यामुळे राजकीय नेतृत्व त्यांच्यापुढे हतबल ठरले आहे. शरीयत लागू करण्यास मान्यता दिल्याने तालिबानी शक्ती अधिक प्रबळ होण्यास मदत होणार आहे.अन्य भागातूनही या स्वरूपाच्या मागण्या पुढे करण्याची व्यूहरचना राबवून सरकारला जेरीस आणण्याचे प्रयत्नही केले जातील. आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी पाकिस्तान ताठ उभा राहू शकत नाही,अशी स्थिती निर्माण झालेली आहे.<br /><br /> स्वात भागातील ताज्या घडामोडीमुळे तालिबानी दहशत भारताच्या सीमेपर्यंत पोचली आहे. पाकिस्तानचा बराचसा भूभाग तालिबानी वर्चस्वाखाली आल्याने या घटकांपासून असलेला धोका भौगोलिकदृष्ट्याही जवळ आलेला आहे, हा भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानात हातपाय पसरत असलेल्या तालिबानचा योग्यवेळी बंदोबस्त करण्याबाबत "सौम्यपणा' स्वीकारण्यात आला, असेही झरदारी यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर आहे. पाकिस्तानमध्ये सत्तेवर कुणीही राहिले असले,त्यांना हा "सौम्यपणा' अपरिहार्यपणे स्वीकारावाच लागला असता. सत्ताधिकाराचे चालन करणाऱ्या शक्ती वेगळ्याच होत्या. "सौम्यपणा'मागे त्याची निश्चित भूमिका होती,ती डावलणे कुणालाही शक्य झाले नसते.त्या शक्तींनी शत्रू मानून भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कार्यक्रम राबविला. तालिबान आणि अल कायदाच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने डावपेचात्मक धोरणाचा भाग म्हणून पाकिस्तानला जवळ केले. भारताने वेळोवेळी सांगूनही पाकिस्तानशी जवळिकीला प्राधान्य दिले. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरविला. त्याचा उपयोग पाकिस्तानने आपली लष्करी ताकद व शस्त्रसज्जता भारताविरुद्ध वापरण्याच्या दृष्टीने वाढविण्यासाठी केला. भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी केला. भारताने याविषयी वारंवार सावध करूनही, त्याविषयी चिंता व्यक्त करूनही त्याची पुरेशी दखल अमेरिकेने घेतली नाही. त्याचे फलित आज असे निघाले आहे,की पाकिस्तान खुद्द त्याच्या भूमीत शिरलेल्या दहशतवादी घटकांचा मुकाबला करण्यास समर्थ उरलेला नाही आणि दहशतवादविरोधी लढ्यातही अपेक्षेइतका सक्षम साथीदार राहिलेला नाही.उलटपक्षी त्याच्याकडील अण्वस्त्रासारखा विद्ध्वंसक शस्त्रसंभार आणि त्याचे नियंत्रण दहशतवादी अथवा त्या देशातील मूलतत्त्ववादी घटकांकडे जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. पाकिस्तानच्या सीमेवर आणि त्याच्या भूमागात बस्तान ठोकलेल्या तालिबानी आणि अल कायदाच्या दहशतवादाचा भारत,अमेरिका आणि खुद्द पाकिस्तानलाही सर्वाधिक धोका निर्माण झालेला आहे.अमेरिकेलाही या वास्तवाची आता जाणीव झालेली आहे.सद्यःस्थितीतील पाकिस्तानवर भिस्त ठेवून दहशतवादविरोधी लढा निर्णायक करता येणार नाही.दहशतवादावर मात करण्यासाठी भारत आणि अमेरिकेला आता वेगळे डावपेच आणि व्यूह रचावा लागेल.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1797576730529496532.post-77790252841947865492009-02-15T05:00:00.000-08:002009-02-15T05:03:33.540-08:00विश्वास जागवणारा निवाडादेशाला हादरवून सोडणाऱ्या निठारी बालहत्याकांडाप्रकरणी नोयड्यातील उद्योजक मोनिंदरसिंग पंधेर आणि त्याचा घरगडी सुरिंदर कोली यांना विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश रमा जैन यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षापूर्वी पंधेर यांच्या बंगल्याजवळील गटारात मानवी हाडे, कवट्या आणि अन्य मानवी अवशेष सापडल्यानंतर सुन्न करणारी भीषण हत्यामालिका उघडकीस आली होती. जवळच्या निठारी गावातील मुलांना फूस लावून पळवायचे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, बलात्कार करायचे,त्यांना ठार करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावायची, अशा अमानुष पद्धतीने सतत दोन वर्षे पंधेर यांच्या बंगल्यात मानवी हत्यासत्र सुरू होते.मुले आणि महिला अशा 19 जणांची हत्या करण्यात आली. त्याप्रकरणी गेली दोन वर्षे विशेष न्यायालयात खटले सुरू असून त्यातील रिम्पा हलदर या 14 वर्षीय मुलीच्या बलात्कार व हत्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.एकूण खटल्यांतील हा पहिला निकाल आहे.<br /><br /> या हत्याकांड प्रकरणात नोयडा पोलिसांचा एकूण कारभारच संशयास्पद आढळून आला होता. निठारीतील मुले बेपत्ता होण्याचे प्रकार दोन वर्षाहून अधिक काळ सुरू होते. पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता, उलटपक्षी तक्रारदारांना मिळणारी वागणूकही योग्य नव्हती.मुला-महिलांचे अवशेष गटारात आढळून आल्यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य उलगडले होते. पोलिसांकडून गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे घेतलेल्या सीबीआयने पंधेर यांना हलदर आणि अन्य दोन मृत्यूप्रकरणात क्लीन चीट दिली होती. आरोपपत्रात त्याच्यावर दोषारोप न ठेवण्याच्या आपल्या भूमिकेचे न्यायालयात समर्थनही केले होते. असे असूनही न्यायाधीशांनी पंधेर यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा म्हणजे सीबीआयच्या मुखात चपराक असल्याचे हत्याकांडात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांतर्फे खटला चालविणारे वकील खलीद खान यांनी व्यक्त केली आहे.तर या देशातही गरिबांना न्याय मिळू शकतो, याबद्दलचा विश्वास दृढ करणारा हा निकाल असल्याची या कुटुंबीयांची प्रतिक्रिया आहे. पंधेर यांच्या मुलाने आपले वडील निर्दोष असल्याचे सांगताना प्रसारमाध्यमांनी गहजब केल्याने आणि न्यायप्रक्रिया प्रभावित केल्याने एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा झाल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयात निकालाविरुद्ध दाद मागण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. सीबीआयची याबाबतची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. अजून काही खटल्यांचे निकाल लागायचे आहेत. न्यायप्रक्रिया आपल्या मार्गाने पुढे सुरू राहणार आहे. जो निवाडा झाला आहे, तो न्यायसंस्थेवरचा विश्वास जागवणारा आहे, परंतु त्याचे महत्त्व त्याहीपलीकडचे आहे. कदाचित गुन्हेगारीसंबंधी खटल्यातील न्यायप्रक्रियेला मार्गदर्शक ठरणारा हा निवाडा असेल.<br /><br /> रिम्पा हलदर हिच्या खुनाच्या वेळी पंधेर परदेशात होते,त्यामुळे त्याचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचा युक्तिवाद सीबीआयने केला होता,अन्य दोन प्रकरणात पंधेर दूरच्या गावी असल्याचे आणि "कायदेशीरदृष्ट्या स्वीकारार्ह पुरावे" पंधेरविरुद्ध नसल्याचे म्हणणे सीबीआयने न्यायालयापुढे मांडले होते. वेगळ्या शब्दात "गुन्हेगारी कटात सहभागा'साठी ज्या स्वरूपाची सामग्री ग्राह्य मानली जाते ,तशी ती पंधेरविरुद्ध नव्हती, हा सीबीआयचा पवित्रा होता.गुन्ह्याच्या वेळी पंधेर परदेशात होते हे मान्य करूनही न्यायाधीशांनी गुन्ह्यातील सहभागाबद्दल पंधेर यांना दोषी धरले आहे.<br /><br /> सुरिंदर कोली हा मनोविकृत असल्याचे प्रारंभिक तपासाच्या वेळी सांगण्यात येत होते.त्याला मृतांशी कामक्रीडेची, मृताचे मांस खाण्याची विकृती असल्याचे सांगण्यात येत होते. जो भीषण हत्यासत्र घडले त्याला तोच सर्वस्वी जबाबदार असल्याचे चित्र सुरवातीला दाखवले गेले होते. मात्र, न्यायाधीशांनी अव्यक्त शब्द वाचले आणि त्याचे अर्थ उलगडले.त्यामुळे पंधेरला शिक्षा सुनावली जाऊ शकली.<br /><br /> आपले वडील निर्दोष आहे म्हणणाऱ्या पंधेरच्या मुलांने वडिलांच्या घरात चालणाऱ्या लैंगिक चाळ्यांकडे दुर्लक्ष केलेले दिसते. स्वतः पंधेर यांनीही काही मुलींशी संबंध असल्याचे मान्य केले आहे. कोली पंधेरकडे कामाला येण्यापूर्वी अनेकांकडे नोकरीला होता. तेव्हा त्यांने हत्या केल्याचे उघड झालेले नाही. जे हत्यासत्र घडले, ते पंधेरकडे आल्यानंतरच, 2004 ते 2006 या दोन वर्षात.त्याचा अजिबात सुगावा पंधेर यांना लागला नाही, हत्या केल्यानंतर घरातच पोलिथिन बॅगात भरून ठेवलेल्या मानवी अवयवाची दूरवरही पोचेल अशी दुर्गंधी पंधेर यांना कधीच जाणवली नाही, हे अविश्वसनीय आहे. पंधेर यांची जीवनशैली कोलीमधील "गुन्हेगारी प्रवृत्ती' जाग्या व प्रकट करण्यास कारणीभूत ठरली. पंधेरचे घरात चालणारे लैंगिक चाळे "लैंगिक सुखाला वंचित' असलेल्या कोलीला उत्तेजित करणारे ठरले आणि त्याचा आविष्कार विकृतपणे घडला.कोली याने दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या जबानीच्या आधार घेत अशा आशयाच्या निरीक्षणातून न्यायाधीशांनी दोष निश्चिती केल्याचे जाणवते.पंधेर यांनी कट रचला आणि त्याच्या नोकराने तो प्रत्यक्षात आणला, असा निष्कर्ष मांडून न्यायाधीशांनी निवाडा केला आहे. एक प्रकारे गुन्ह्याचा शोध घेऊन निर्णय केला आहे. सीबीआय नेमक्या याच भूमिकेत चुकले आहे.sureshnaikhttp://www.blogger.com/profile/02480054587548536923noreply@blogger.com0